HomeArchiveजोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर...

जोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारा – रविंद्र वायकर

Details
जोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारा – रविंद्र वायकर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबई ही क्रिकेटची पंढरी समजली जाते. अशातच मुंबईच्या शहर, पूर्व व पश्‍चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळण्यात येते. परंतु पूर्व उपनगरांतील उदयोन्मुख खेळाडूंना अद्ययावत क्रिकेटचे स्टेडियम नसल्याने जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या भुखंडावर क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यात यावे, अशी विनंती विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.

पश्‍चिम उपनगराबरोबरच पूर्व उपनगरातील अनेक क्रिकेटपटू राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राज्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. परंतु जोगेश्‍वरी परिसरात व उपनगरांमध्ये क्रिकेट या खेळाकरीता स्टेडियम उपलब्ध नसल्याने उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपले क्रीडानैपूण्य चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस आरे येथे असलेला रिक्त भूखंड स्टेडियमसाठी आरक्षित करणे आवश्यक असल्याचे वायकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

याठिकाणी अद्यावत स्टेडियम उभे राहिल्यास क्रिकेटपटूंच्या नैपुण्यात अधिक चांगल्या पद्धतीने वाढ तर होईलच, पण यामुळे राज्याचे तसेच देशाचादेखील नावलौकीक वाढण्यास मदत होईल. देशासाठी भावी क्रिकेटपटू तयार करण्यासाठी या स्टेडियमच्या उभारणीसाठी येणारा खर्च, हा खर्च न समजता भविष्यातील तरुण पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी गुंतवणूक असणार असल्याचे मतही वायकर यांनी व्यक्त केले आहे.

उदयोन्मुख खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करुन आरेमध्ये उपरोक्त आरक्षित जागेवर वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ५० कोटींची विशेष तरतूद करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
मुंबई ही क्रिकेटची पंढरी समजली जाते. अशातच मुंबईच्या शहर, पूर्व व पश्‍चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळण्यात येते. परंतु पूर्व उपनगरांतील उदयोन्मुख खेळाडूंना अद्ययावत क्रिकेटचे स्टेडियम नसल्याने जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या भुखंडावर क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यात यावे, अशी विनंती विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.

पश्‍चिम उपनगराबरोबरच पूर्व उपनगरातील अनेक क्रिकेटपटू राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राज्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. परंतु जोगेश्‍वरी परिसरात व उपनगरांमध्ये क्रिकेट या खेळाकरीता स्टेडियम उपलब्ध नसल्याने उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपले क्रीडानैपूण्य चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस आरे येथे असलेला रिक्त भूखंड स्टेडियमसाठी आरक्षित करणे आवश्यक असल्याचे वायकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

याठिकाणी अद्यावत स्टेडियम उभे राहिल्यास क्रिकेटपटूंच्या नैपुण्यात अधिक चांगल्या पद्धतीने वाढ तर होईलच, पण यामुळे राज्याचे तसेच देशाचादेखील नावलौकीक वाढण्यास मदत होईल. देशासाठी भावी क्रिकेटपटू तयार करण्यासाठी या स्टेडियमच्या उभारणीसाठी येणारा खर्च, हा खर्च न समजता भविष्यातील तरुण पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी गुंतवणूक असणार असल्याचे मतही वायकर यांनी व्यक्त केले आहे.

उदयोन्मुख खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करुन आरेमध्ये उपरोक्त आरक्षित जागेवर वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ५० कोटींची विशेष तरतूद करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.”

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content