Details
जोगेश्वरीत वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारा – रविंद्र वायकर
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबई ही क्रिकेटची पंढरी समजली जाते. अशातच मुंबईच्या शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळण्यात येते. परंतु पूर्व उपनगरांतील उदयोन्मुख खेळाडूंना अद्ययावत क्रिकेटचे स्टेडियम नसल्याने जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या भुखंडावर क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यात यावे, अशी विनंती विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.
पश्चिम उपनगराबरोबरच पूर्व उपनगरातील अनेक क्रिकेटपटू राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राज्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. परंतु जोगेश्वरी परिसरात व उपनगरांमध्ये क्रिकेट या खेळाकरीता स्टेडियम उपलब्ध नसल्याने उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपले क्रीडानैपूण्य चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस आरे येथे असलेला रिक्त भूखंड स्टेडियमसाठी आरक्षित करणे आवश्यक असल्याचे वायकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
याठिकाणी अद्यावत स्टेडियम उभे राहिल्यास क्रिकेटपटूंच्या नैपुण्यात अधिक चांगल्या पद्धतीने वाढ तर होईलच, पण यामुळे राज्याचे तसेच देशाचादेखील नावलौकीक वाढण्यास मदत होईल. देशासाठी भावी क्रिकेटपटू तयार करण्यासाठी या स्टेडियमच्या उभारणीसाठी येणारा खर्च, हा खर्च न समजता भविष्यातील तरुण पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी गुंतवणूक असणार असल्याचे मतही वायकर यांनी व्यक्त केले आहे.
उदयोन्मुख खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करुन आरेमध्ये उपरोक्त आरक्षित जागेवर वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ५० कोटींची विशेष तरतूद करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो
मुंबई ही क्रिकेटची पंढरी समजली जाते. अशातच मुंबईच्या शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळण्यात येते. परंतु पूर्व उपनगरांतील उदयोन्मुख खेळाडूंना अद्ययावत क्रिकेटचे स्टेडियम नसल्याने जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या भुखंडावर क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यात यावे, अशी विनंती विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.
पश्चिम उपनगराबरोबरच पूर्व उपनगरातील अनेक क्रिकेटपटू राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राज्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. परंतु जोगेश्वरी परिसरात व उपनगरांमध्ये क्रिकेट या खेळाकरीता स्टेडियम उपलब्ध नसल्याने उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपले क्रीडानैपूण्य चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस आरे येथे असलेला रिक्त भूखंड स्टेडियमसाठी आरक्षित करणे आवश्यक असल्याचे वायकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
याठिकाणी अद्यावत स्टेडियम उभे राहिल्यास क्रिकेटपटूंच्या नैपुण्यात अधिक चांगल्या पद्धतीने वाढ तर होईलच, पण यामुळे राज्याचे तसेच देशाचादेखील नावलौकीक वाढण्यास मदत होईल. देशासाठी भावी क्रिकेटपटू तयार करण्यासाठी या स्टेडियमच्या उभारणीसाठी येणारा खर्च, हा खर्च न समजता भविष्यातील तरुण पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी गुंतवणूक असणार असल्याचे मतही वायकर यांनी व्यक्त केले आहे.
उदयोन्मुख खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करुन आरेमध्ये उपरोक्त आरक्षित जागेवर वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ५० कोटींची विशेष तरतूद करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.”

