HomeArchiveजुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी...

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सक्त निर्णय घ्यावा – मंगलप्रभात लोढा

Details
जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सक्त निर्णय घ्यावा – मंगलप्रभात लोढा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई शहरातील हजारो जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारने तत्काळ मॉडल एग्रीमेंट मसूदा लागू करावा. यामुळे लाखो भाडोत्रींसोबत होणारी फसवणूक बंद होईल. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत ही मागणी केली आहे. पुनर्निर्माणाच्या नावावर ज्या जुन्या इमारतींना रिकामी करण्याबरोबरच दोन वर्षांपर्यंत त्याचा पुनर्निर्माण केला जात नाही, त्यांना म्हाडाला सोपवून त्यांचा विकास केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली. सरकारने या प्रक्रियेत पाऊल उचलल्याने मुंबईतील लाखो नागरिकांना मदत होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा नियम २९३ च्यानुसार मुंबईच्या प्रस्तावावर सभेत जुन्या इमारतींचा विकास व पुनर्निर्माण झालेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांच्या त्रासाचा मुद्दा आमदार लोढा यांनी विधानसभेत मांडला. सरकारने या प्रकरणात तत्काळ व गांभीर्याने निर्णय घ्यावेत, असे ते म्हणाले. जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांचा त्रास वाढत आहे. विकासक (बांधकाम व्यावसायिक) इमारत रिकामी केल्यानंतंर अनेक वर्षांनंतंरही त्याचे बांधकाम करीत नाही. त्याशिवाय शिफ्टिंगचे भाडेही देत नाही. जुन्या इमारतींचा पुनर्निर्माण करण्यासाठी मॉडल एग्रीमेंट मसूदा तत्काळ प्रभावी पद्धीतीने लागू करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

 

मुंबई शहरात सुमारे २० हजारहून जास्त पागडी पद्धतीने अत्यंत जर्जर झालेल्या जुन्या इमारती आहेत. त्यामध्ये साधारण २० लाखांहून जास्त लोक राहत आहेत. या इमारती अत्यंत जर्जर असून धोकादायक आहेत. सरकारच्या सध्याच्या नियमांमुळे त्यांचे पुनर्निर्माण व डागडुजीचे काम रखडले आहे. त्यामुळे लाखो नागरिक त्रस्त आहेत. पुनर्विकास करणाऱ्या सरकारने जो मंडल मसुदा लागू करण्याबाबत सांगितले होते, तो तत्काळ लागू करण्यात यावा. ज्यामुळे लाखो लोकांना कमी वेळात घरे मिळू शकतील आणि या जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांचे जीवन सहज होऊ शकतील.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई शहरातील हजारो जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारने तत्काळ मॉडल एग्रीमेंट मसूदा लागू करावा. यामुळे लाखो भाडोत्रींसोबत होणारी फसवणूक बंद होईल. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत ही मागणी केली आहे. पुनर्निर्माणाच्या नावावर ज्या जुन्या इमारतींना रिकामी करण्याबरोबरच दोन वर्षांपर्यंत त्याचा पुनर्निर्माण केला जात नाही, त्यांना म्हाडाला सोपवून त्यांचा विकास केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली. सरकारने या प्रक्रियेत पाऊल उचलल्याने मुंबईतील लाखो नागरिकांना मदत होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा नियम २९३ च्यानुसार मुंबईच्या प्रस्तावावर सभेत जुन्या इमारतींचा विकास व पुनर्निर्माण झालेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांच्या त्रासाचा मुद्दा आमदार लोढा यांनी विधानसभेत मांडला. सरकारने या प्रकरणात तत्काळ व गांभीर्याने निर्णय घ्यावेत, असे ते म्हणाले. जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांचा त्रास वाढत आहे. विकासक (बांधकाम व्यावसायिक) इमारत रिकामी केल्यानंतंर अनेक वर्षांनंतंरही त्याचे बांधकाम करीत नाही. त्याशिवाय शिफ्टिंगचे भाडेही देत नाही. जुन्या इमारतींचा पुनर्निर्माण करण्यासाठी मॉडल एग्रीमेंट मसूदा तत्काळ प्रभावी पद्धीतीने लागू करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

 

मुंबई शहरात सुमारे २० हजारहून जास्त पागडी पद्धतीने अत्यंत जर्जर झालेल्या जुन्या इमारती आहेत. त्यामध्ये साधारण २० लाखांहून जास्त लोक राहत आहेत. या इमारती अत्यंत जर्जर असून धोकादायक आहेत. सरकारच्या सध्याच्या नियमांमुळे त्यांचे पुनर्निर्माण व डागडुजीचे काम रखडले आहे. त्यामुळे लाखो नागरिक त्रस्त आहेत. पुनर्विकास करणाऱ्या सरकारने जो मंडल मसुदा लागू करण्याबाबत सांगितले होते, तो तत्काळ लागू करण्यात यावा. ज्यामुळे लाखो लोकांना कमी वेळात घरे मिळू शकतील आणि या जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांचे जीवन सहज होऊ शकतील.”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content