HomeArchiveगेट वे ऑफ...

गेट वे ऑफ इंडियावर अनुभवता येणारा थरार..

Details

 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
“हेरिटेज वास्तू, पर्यावरण संवर्धन, वाहन सुरक्षेचा संदेश देणारा उपक्रम ‘वुई वन इव्हेन्ट’ यांच्या वतीने मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे रविवार दिनांक २४ नोव्हेंबरला होत आहे. मुंबई शहरात होणाऱ्या हौजी राईड २०१९ या बाईकवरून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष असून याबाबतची क्रीडा क्षेत्रातील उत्सुकता वाढली आहे.”

 
“मुंबईतील पुरातत्व विभागाने सांस्कृतिक वारसा जतन करणारी काही स्थळं निश्चित केली असून दुचाकीवरून स्पर्धकांना त्याचा ठावठिकाणा शोधावा लागणार आहे. त्याचबरोबर सुरक्षित वाहन चालविण्याचे निकषदेखील यंत्रणेच्या माध्यमातून तपासून स्पर्धकांना एकूण १० लाख रूपयांची वेगवेगळ्या वर्गवारीतील पारितोषिके दिली जाणार आहेत. एकप्रकारे ही एक अनोखी सहल आणि सफर असेल. मुंबईतील विविध ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्थळांचा शोध त्यातून घेता येईल. हौजी खेळाप्रमाणे बाईकस्वारांना एक तिकीट व क्ल्यू बुक दिले जाईल. त्यानुसार त्या-त्या क्रमांकावरील स्थळे शोधायची आहेत. संबंधित ठिकाण बरोबर शोधले की नाही, हे स्पर्धकांना त्यांच्याजवळ दिलेल्या यंत्राद्वारे कळणार आहे.”
 
 
“स्पर्धा जिंकण्याच्या भरात त्यांनी बाईक व्यवस्थित चालवली का, वेगमर्यादा ओलांडली का, अर्जंट ब्रेक किती वेळा वापरला याचेही परिक्षण होणार आहे. यंदा स्पर्धकांकडून मोठ्या प्रमाणावर सहभाग आला असून त्यांनी केलेल्या मागणीमुळेच नावनोंदणीची मुदत वाढविण्यात आली आहे. स्पर्धेची अधिक माहिती www.houjiride.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत ९०८२३७५३८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.”
 
 
 

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content