HomeArchive“गगनयान” मोहिमेवर कोविडचा...

“गगनयान” मोहिमेवर कोविडचा परिणाम शून्य!

Details

 

 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
भारताच्या “गगनयान” या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या प्रक्षेपणावर कोविड-१९ महामारीचा परिणाम होणार नाही आणि याची तयारी योग्य दिशेने सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी नुकतीच दिली.
 
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अंतराळ विभागाची गेल्या एक वर्षातील महत्त्वपूर्ण कामगिरी आणि भविष्यासाठी आखण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या मोहिमांबद्दल माहिती देताना डॉ. सिंह म्हणाले की, कोविड-१९ महामारीमुळे रशियामध्ये चार भारतीय अंतराळवीरांचे प्रशिक्षण थांबवावे लागले. मात्र, इस्त्रोचे अध्यक्ष आणि वैज्ञानिक चमूचे मत असे आहे की, प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रक्षेपणाची तारीख यात थोडे अधिक अंतर यापूर्वीच ठेवण्यात आले आहे. अंतराळवीरांचे प्रशिक्षण आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आणि २०२२मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनापूर्वी नियोजित वेळापत्रकानुसार हे प्रक्षेपण होणार आहे.
 
इस्रोच्या उपक्रमांमध्ये खासगी सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती देताना डॉ. सिंह म्हणाले की, “भारतीय राष्ट्रीय अंतराळ प्रोत्साहन आणि प्राधिकरण केंद्र (आयएन-स्पेस)” नावाची नियामक संस्था स्थापन केली जाईल. यामुळे खाजगी कंपन्यांना समान संधी उपलब्ध होतील आणि त्यांचा सहभाग प्रोत्साहित करण्यास मदत होईल. आपल्या अंतराळ मोहिमेची क्षमता आणि संसाधने वाढविण्याबरोबरच खासगी कंपन्यांचा वाढता सहभाग यामुळे प्रतिभावान अंतराळ वैज्ञानिक आणि तज्,ज्ञ जे नवीन संधींच्या शोधात भारताबाहेर जात होते ते बाहेर जाण्यापासून परावृत्त होतील.
 
सध्यातरी याचे प्रक्षेपण पुढील वर्षी करण्याचे नियोजन आहे. या मोहिमेमध्ये मॉड्यूल घेऊन जाण्यासाठी एक लँडर, रोव्हर आणि प्रॉपल्शन सिस्टमचा समावेश असेल. मात्र यात ऑर्बिटर असणार नाही. कारण याआधीचा ऑर्बिटर पूर्णपणे कार्यरत आहे, असे ते म्हणाले.
 “

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content