HomeArchiveखेलो इंडिया युथ...

खेलो इंडिया युथ गेम्स २०१९

Details
खेलो इंडिया युथ गेम्स २०१९

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने व्दितीय `खेलो इंडिया युथ गेम्स, २०१९’ येत्या आठ जानेवारीपासून पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात येणार आहेत. २० जानेवारीपर्यंत हा क्रीडा महोत्सव चालणार आहे.
“खेलो इंडिया युथ गेम्स” मध्ये विविध प्रकारच्या १८ खेळांच्या स्पर्धा होणार असून यात १७ वर्षांखालील व २१ वर्षांखालील मुले व मुली सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत संपूर्ण देशामधून भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू/संघ तसेच राष्ट्रीय क्रीडा संघटनेद्वारा आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील संघ वा खेळाडू, सीबीएससी राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू तसेच स्पर्धा आयोजक राज्याने निवड केलेले खेळाडू असे सुमारे १२ हजार ५०० खेळाडू, तांत्रिक अधिकारी, क्रीडा प्रशिक्षक व स्वयंसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिली.

 

राज्याचे ७६९ खेळाडू तसेच ७२ मार्गदर्शक यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धांमधील विविध क्रीडा प्रकार ज्या क्रीडांगणामध्ये होणार आहेत, त्या सर्व क्रीडांगणांच्या प्रवेशद्वारांना महाराष्ट्रातील नामवंत क्रीडापटूंची नावे व त्यांची प्रदर्शनी ठेवण्यात येतील. त्याचप्रमाणे क्रीडा संकुलात स्पोर्टस एक्स्पो व खेळांचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी विशेष सुविधा ठेवण्यात आली आहे. क्रीडापटू व खेळाडू यांना आवश्यक असणारे फिटनेस व संतुलित आहार या विषयांचे मोफत मार्गदर्शन यावेळी देण्यात येईल. त्याचप्रमाणे क्रीडामधील कौशल्य विकास व करियरच्या संधी याबाबत मोफत मार्गदर्शनचा लाभ युवकांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील विविध शाळातील खेळाडूंना या स्पर्धा पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना देशातील विविध राज्यातील नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.

खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन महाराष्ट्रात होत असल्यामुळे महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती निर्माण करण्याची संधी महाराष्ट्राला मिळत आहे. महाराष्ट्रातील शालेय व युवा खेळाडूंनी, क्रीडा स्पर्धांकडे आकर्षित व्हावे व या क्रीडा स्पर्धामध्ये आपला सहभाग नोंदवावा, हे आमचे उदिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने व्दितीय `खेलो इंडिया युथ गेम्स, २०१९’ येत्या आठ जानेवारीपासून पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात येणार आहेत. २० जानेवारीपर्यंत हा क्रीडा महोत्सव चालणार आहे.
“खेलो इंडिया युथ गेम्स” मध्ये विविध प्रकारच्या १८ खेळांच्या स्पर्धा होणार असून यात १७ वर्षांखालील व २१ वर्षांखालील मुले व मुली सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत संपूर्ण देशामधून भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू/संघ तसेच राष्ट्रीय क्रीडा संघटनेद्वारा आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील संघ वा खेळाडू, सीबीएससी राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू तसेच स्पर्धा आयोजक राज्याने निवड केलेले खेळाडू असे सुमारे १२ हजार ५०० खेळाडू, तांत्रिक अधिकारी, क्रीडा प्रशिक्षक व स्वयंसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिली.

 

राज्याचे ७६९ खेळाडू तसेच ७२ मार्गदर्शक यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धांमधील विविध क्रीडा प्रकार ज्या क्रीडांगणामध्ये होणार आहेत, त्या सर्व क्रीडांगणांच्या प्रवेशद्वारांना महाराष्ट्रातील नामवंत क्रीडापटूंची नावे व त्यांची प्रदर्शनी ठेवण्यात येतील. त्याचप्रमाणे क्रीडा संकुलात स्पोर्टस एक्स्पो व खेळांचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी विशेष सुविधा ठेवण्यात आली आहे. क्रीडापटू व खेळाडू यांना आवश्यक असणारे फिटनेस व संतुलित आहार या विषयांचे मोफत मार्गदर्शन यावेळी देण्यात येईल. त्याचप्रमाणे क्रीडामधील कौशल्य विकास व करियरच्या संधी याबाबत मोफत मार्गदर्शनचा लाभ युवकांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील विविध शाळातील खेळाडूंना या स्पर्धा पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना देशातील विविध राज्यातील नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.

खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन महाराष्ट्रात होत असल्यामुळे महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती निर्माण करण्याची संधी महाराष्ट्राला मिळत आहे. महाराष्ट्रातील शालेय व युवा खेळाडूंनी, क्रीडा स्पर्धांकडे आकर्षित व्हावे व या क्रीडा स्पर्धामध्ये आपला सहभाग नोंदवावा, हे आमचे उदिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.”
 

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content