HomeArchiveकांदिवलीच्या आकुर्ली रोडच्या...

कांदिवलीच्या आकुर्ली रोडच्या वाहतूककोंडीवर प्रभावी मात्रा!

Details
कांदिवलीच्या आकुर्ली रोडच्या वाहतूककोंडीवर प्रभावी मात्रा!

    18-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईच्या कांदिवली (पूर्व) आकुर्ली रोडच्या अरूंद भुयारी मार्गामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीच्या समस्येचा येत्या काही दिवसात उतारा होणार आहे. कांदिवली पूर्वचे भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नाने या भुयारी मार्गाच्या रूंदीकरणाची वर्कऑर्डर जारी करण्यात आली असून आठवड्याभरात काम सुरू होईल. या कामाचे भूमीपूजन नुकतेच खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार भातखळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
 
आकुर्ली रोडच्या वाहतूककोंडीच्या समस्येचा कांदिवली पूर्वमधील लोकांना अनेक वर्ष त्रास होत आहे. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी ही समस्या सोडवण्याच्या दिशेने गेली पाच वर्षे जोरदार प्रयत्न केले. एकीकडे त्यांनी महिंद्रा कंपनीपासून समतानगरपर्यंत जाणाऱ्या पर्यायी डीपी रोडचा मार्ग निर्वेध केला असताना आकुर्ली भुयारी मार्गाची समस्यासुद्धा निर्णायकरित्या सोडवली. त्यांच्या प्रयत्नाने या भुयारी मार्गाच्या रूंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
 
हा भुयारी मार्ग १६ फुटांचा असून याची रूंदी ३३.१० फूट म्हणजे दुप्पटीपेक्षा जास्त होणार आहे. रूंदीकरणासाठी २६ कोटी ८३ लाख रूपये खर्च करण्यात येणार असून काम ३ वर्षांत पूर्ण होईल. हा अरूंद भुयारी मार्ग वाहतूककोंडीचे महत्त्वाचे कारण बनला होता. या कामासाठी मेट्रो ऑथेरिटीची परवानगी मिळाली आहे. मतदारांना दिलेले एक महत्त्वाचे आश्वासन पूर्ण करू शकलो याचे मला समाधान आहे, असे भातखळकर म्हणाले.
 

 
 
 
आमदार भातखळकर यांना नागरी समस्यांची नेमकी जाण असून त्यांच्यामध्ये या समस्या सोडवण्यासाठी लागणारी धमकही पुरेपूर आहे, या शब्दांत खासदार गोपाळ शेट्टी यांनी भातखळकर यांचे कौतुक केले. भूमीपूजनाला कांदिवली पूर्वतील नागरीकांनी भर पावसात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
 

 
 

 
 
 ”

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
मुंबईच्या कांदिवली (पूर्व) आकुर्ली रोडच्या अरूंद भुयारी मार्गामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीच्या समस्येचा येत्या काही दिवसात उतारा होणार आहे. कांदिवली पूर्वचे भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नाने या भुयारी मार्गाच्या रूंदीकरणाची वर्कऑर्डर जारी करण्यात आली असून आठवड्याभरात काम सुरू होईल. या कामाचे भूमीपूजन नुकतेच खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार भातखळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
 

आकुर्ली रोडच्या वाहतूककोंडीच्या समस्येचा कांदिवली पूर्वमधील लोकांना अनेक वर्ष त्रास होत आहे. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी ही समस्या सोडवण्याच्या दिशेने गेली पाच वर्षे जोरदार प्रयत्न केले. एकीकडे त्यांनी महिंद्रा कंपनीपासून समतानगरपर्यंत जाणाऱ्या पर्यायी डीपी रोडचा मार्ग निर्वेध केला असताना आकुर्ली भुयारी मार्गाची समस्यासुद्धा निर्णायकरित्या सोडवली. त्यांच्या प्रयत्नाने या भुयारी मार्गाच्या रूंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
 
“हा भुयारी मार्ग १६ फुटांचा असून याची रूंदी ३३.१० फूट म्हणजे दुप्पटीपेक्षा जास्त होणार आहे. रूंदीकरणासाठी २६ कोटी ८३ लाख रूपये खर्च करण्यात येणार असून काम ३ वर्षांत पूर्ण होईल. हा अरूंद भुयारी मार्ग वाहतूककोंडीचे महत्त्वाचे कारण बनला होता. या कामासाठी मेट्रो ऑथेरिटीची परवानगी मिळाली आहे. मतदारांना दिलेले एक महत्त्वाचे आश्वासन पूर्ण करू शकलो याचे मला समाधान आहे, असे भातखळकर म्हणाले.”
 

 
 
 
“आमदार भातखळकर यांना नागरी समस्यांची नेमकी जाण असून त्यांच्यामध्ये या समस्या सोडवण्यासाठी लागणारी धमकही पुरेपूर आहे, या शब्दांत खासदार गोपाळ शेट्टी यांनी भातखळकर यांचे कौतुक केले. भूमीपूजनाला कांदिवली पूर्वतील नागरीकांनी भर पावसात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.”
 

 
 

 
 
 

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content