HomeArchiveकलम ३७० रद्द;...

कलम ३७० रद्द; मुंबई भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष!

Details
 
 
 
 
 
केएचएल ब्युरो
hegdekiran17@gmail.com 
 
“देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या लोकांनी जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० व ३५-अ हटवल्याचे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखचे विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे जबरदस्त स्वागत केले आहे. भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या या निर्णयाचे लोकांमध्ये मिठाई वाटून स्वागत करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी लोढा म्हणाले की, मोदीजी आणि अमित भाईंनी आपल्या दृढनिश्चय शक्तीचा परिचय देत एक अत्यंत साहसी निर्णय घेतला आहे.”
 

“मुंबईमधील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाची सुरूवात “”जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा है”” चा नारा देत शामाप्रसाद मुखर्जी यांना पुष्पहार अर्पण करून झाली. मुंबई अध्यक्ष लोढा यांच्यासह आमदार तमिल सेलवन, भाई गिरकर, आमदार राज पुरोहित, अतुल शाह, शायना एनसी यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना जम्मू-काश्मीर अनुच्छेद ३८० व ३५-अ हटवण्याचा निर्णय, तसेच जम्मू-काश्मीर व लडाख वेगळे करून केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्यासहित अनेक पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्याने आपसात मिठाई वाटून, एक दुसऱ्यांना शुभेच्छा देत नरेंद्र मोदी आणि अमित शाह जिंदाबादचे नारे लगावत जल्लोष साजरा केला. यावेळी राजकीय कार्यकर्त्यांसह विविध कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
 
 
 
 
 
पुढील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

साहसी खेळाशी संबंधित आज चर्चासत्र
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/14/Today-s-seminar-on-adventure-sports.html
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content