HomeArchiveइनोव्हेटिव्ह स्टुडंट प्रोजेक्ट्स...

इनोव्हेटिव्ह स्टुडंट प्रोजेक्ट्स पुरस्कारासाठी नामांकने आमंत्रित

Details

 
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत भारतीय अभियांत्रिकी राष्ट्रीय अकादमी या स्वायत्त संस्थेने इनोव्हेटिव्ह स्टुडंट प्रोजेक्ट्स पुरस्कार 2020 साठी नामांकनपत्रे मागविली आहेत.
 
“या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तीन श्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रकल्प पात्र असतील– अंतिम वर्ष (चौथे वर्ष) बी.ई., बी.टेक. किंवा बी.एसी. (अभियांत्रिकी) शैक्षणिक वर्ष 2019-20साठी 31 जुलै 2020पर्यंत पूर्ण झालेले प्रकल्प, 2019-2020 या शैक्षणिक वर्षादरम्यान 1 जुलै 2019 ते 31 जुलै 2020पर्यंत एम.ई. किंवा एम.टेक., एम.एसी. (अभियांत्रिकी) विद्यार्थ्यांचे तपासलेले प्रबंध, 1 जून 2019 ते 31 मे 2020पर्यंतचे तपासलेले प्रबंध पुरस्कारासाठी मान्यताप्राप्त आहेत/शिफारस केली आहे.”
 
“अभियांत्रिकी संस्थांमधील पदवीधर, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट या तीन महत्त्वपूर्ण टप्प्यांमधील कोणत्याही विद्यार्थ्याने हाती घेतलेल्या नाविन्यपूर्ण आणि कल्पक संशोधन प्रकल्पाची निवड करण्यासाठी आयएनएईने 1998मध्ये इनोव्हेटिव्ह स्टुडंट प्रोजेक्ट्स पुरस्काराची स्थापना केली. हा पुरस्कार विशेषत: उद्योग, संशोधन प्रयोगशाळा आणि शैक्षणिक संस्थांमधील संयुक्त प्रकल्पांना प्रोत्साहित करतो. युवा प्रतिभेला प्रोत्साहित करून त्यांना मान्यता आणि प्रोत्साहन प्रदान करण्याचा हा एक प्रयत्न आहे. गेल्या बावीस वर्षांत पुरस्काराला मिळालेला प्रतिसाद बऱ्यापैकी उत्साहवर्धक असला तरीदेखील अकादमीला समाज आणि व्यवसायातील मोठ्या भागापर्यंत व्यापक स्तरावर पोहोचण्याची इच्छा आहे.”

“नामनिर्देशन पत्र मुख्याध्यापक, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा संस्थेचे संचालक किंवा निबंधक यांनी पाठवावे जिथे उमेदवाराने पदवी पुरस्कारासाठी आपला प्रकल्प/प्रबंध तयार केला असेल. उमेदवार सध्या कार्यरत असलेल्या संस्थेद्वारे नामनिर्देशन पत्र पाठवू नये. अभियांत्रिकी महाविद्यालय/संस्थांकडून पदवीधर, पदव्युत्तर किंवा डॉक्टरेट स्तराशी संबंधित प्रकल्प/प्रबंधासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे.”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content