HomeArchiveआयआयटी मुंबईने सुरू...

आयआयटी मुंबईने सुरू केले स्व-मदत संकेतस्थळ

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी काल सकाळी आयआयटी मुंबईने आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या बंधू-स्वमदत गट संकेतस्थळाचे उद्घाटन, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी यांच्या उपस्थितीत केले.”
 
“चांगली शैक्षणिक संस्था म्हणजे जेथे प्रत्येक विद्यार्थ्याला आपले स्वागत होत आहे आणि काळजी घेतली जाते. सुरक्षित आणि उत्साही शैक्षणिक वातावरण, विस्तृत शैक्षणिक पध्दतीचा अनुभव, उत्तम भौतिक पायाभूत सुविधा, उचित संसाधनांचा वापर येथे शैक्षणिक अनुकूलतेसाठी केला जातो. विद्यार्थी हे शैक्षणिक व्यवस्थेचे प्रमुख भागीदार आहेत. उत्साही महाविद्यालयीन जीवन उच्च दर्जाच्या शिकण्या-शिकविण्यासाठी आवश्यक असते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळ, संस्कृती/कला क्लब, पर्यावरण क्लब, कार्यकारी क्लब, सामाजिक सेवा प्रकल्प अशा प्रकारच्या विविध ठिकाणच्या भरपूर संधी देण्यात याव्यात, असे ते म्हणाले.”
 

 
“‘बंधू’ची रचना आयआयटीतील समुपदेशक आणि बाह्य तज्ज्ञ यांनी संयुक्तपणे तयार केली असून त्यात त्यांना डीन प्रा. टी कडू (विद्यार्थी कल्याण) आणि प्रा.सुहास जोशी (माजी विद्यार्थी आणि सामूहिक संबंध) यांनी सहाय्य केले आहे. शैक्षणिक जीवनात येणाऱ्या कॉलेज जीवनातील ताणापासून, अभ्यासाचा तणाव आणि मानसिक आरोग्य यासारख्या सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हे सहाय्य करेल. बंधूमधे विविध वाचनीय लेख, माजी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास, तज्ज्ञांचे पॉडकास्ट्स आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी आवश्यक साधने यांचा समावेश आहे.”
 
“बंधूची संकल्पना 1992 सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या 2017 साली झालेल्या रौप्य महोत्सवी पुनर्मिलनाच्या वेळी मांडली गेली. त्यांनी आयआयटी मुंबईला मदत करण्याची प्रतिज्ञा केली आणि विद्यार्थ्यांच्या भावनिक समृद्धीत वृद्धी करण्याचे ठरविले. स्व-मदत संकेतस्थळ हे त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. ते या प्रकल्पाची काळजीपूर्वक अंमलबजावणी करत आहे. आपण अशा काळात आहोत, जिथे तणावामुळे त्रस्त व्हायला होते. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी, त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर होण्याची गरज आहे, असे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी यावेळी म्हणाले.”

 
“अनेक गोष्टी सुरूवातीच्या टप्प्यात प्रभावीपणे हाताळता आल्या तर विद्यार्थ्यांना सहाय्य करून विद्यार्थ्यांना ही आव्हाने पेलणे शक्य होऊन, एकामागोमाग एक येणारी संकटे (डॉमिनो ईफेक्ट) टाळता येतात. त्याचप्रमाणे आयआयटी मुंबईतील आधार व्यवस्थेची मदत घ्यायची वेळ कोणती हेही यामुळे लक्षात येईल, असे आयआयटीच्या 1992च्या तुकडीतील माजी विद्यार्थिनी रेखा कोयता यावेळी म्हणाल्या. प्रख्यात सिनेनिर्माता आणि आयआयटीचे माजी विद्यार्थी नीतेश तिवारी हेदेखील या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.”

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content