HomeArchiveआधुनिकतेने हिरावले आमचे...

आधुनिकतेने हिरावले आमचे संस्कार – अभिनेते शैलेश लोढा

Details
आधुनिकतेने हिरावले आमचे संस्कार – अभिनेते शैलेश लोढा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
माणसांनी तांत्रिकरीत्या प्रगती केली, ही बाब खरी.. पण, त्याचसोबत या प्रगतीतील आधुनिकतेने आपल्यातील संस्कार हिरावले आहेत, असे मत लोकप्रिय टिव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम, सुप्रसिद्ध अभिनेते व ज्येष्ठ हिंदी कवी शैलेश लोढा यांनी व्यक्त केले.

‘मारवाड़ीज इन थाने वेलफेअर’ या संस्थेच्या वतीने ठाणे (प.) येथील गडकरी रंगायतन येथे प्रवासी राजस्थानी समाजास एका व्यासपीठावर आणण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘राजस्थान महोत्सव-२०१९’ सोहळ्यात ते बोलत होते.

 

संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा व महाराष्ट्र काँग्रेसच्या सरचिटणीस सुमन आर. अग्रवाल यांच्या संयोजनाखाली पार पडलेल्या या भव्य सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी चुरू (राजस्थान) येथील नवनिर्वाचित आमदार व आंतरराष्ट्रीय एथलीट पद्मश्री कृष्णा पुनिया आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस बी. एम. संदीप प्रमुख पाहुणे म्हणून तर महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस गणेश पाटील, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे, उल्हासनगर काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला विशेष पाहुणे होते.

सोहळ्याची सुरूवात पारंपरिक शैलीतील गणेश वंदनेच्या समूहनृत्याने झाली. सदर सोहळ्यात ज्येष्ठ समाजसेवी-उद्योगपती सत्यनारायण बजाज यांना संस्थेच्या वतीने या वर्षाचे प्रतिष्ठित ‘मारवाड़ रत्न’ व अनिता टिबरेवाल यांना ‘महिला उद्योगरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योगपती-समाजसेवक दीनदयाल मुरारका, रमाकांत परसरामपुरिया, एस. एल. पोखरणा, राधेश्याम अग्रवाल, अमर ठाकुर, एल. व्ही. राठी, विक्रम जैन, संदीप गर्ग, डॉ. राजेंद्र अग्रवाल, शिवकांत खेतान, महेश बंसीधर अग्रवाल, विकास केडिया, सुरेंद्र रूइया, ब्रिज मित्तल, उत्तम जैन, सुरेश राठोड, चंचल झंवर, अभिनेत्री गरिमा जैन, सीमा नैयर, प्रजापिता ब्रह्मकुमारी समाजच्या लतिका दिदी आणि टाइम्स एंड ट्रेंड्स एकेडमीच्या संचालिका निकीता अग्रवाल, विरेंद्र पुनिया आदी उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
माणसांनी तांत्रिकरीत्या प्रगती केली, ही बाब खरी.. पण, त्याचसोबत या प्रगतीतील आधुनिकतेने आपल्यातील संस्कार हिरावले आहेत, असे मत लोकप्रिय टिव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम, सुप्रसिद्ध अभिनेते व ज्येष्ठ हिंदी कवी शैलेश लोढा यांनी व्यक्त केले.

‘मारवाड़ीज इन थाने वेलफेअर’ या संस्थेच्या वतीने ठाणे (प.) येथील गडकरी रंगायतन येथे प्रवासी राजस्थानी समाजास एका व्यासपीठावर आणण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘राजस्थान महोत्सव-२०१९’ सोहळ्यात ते बोलत होते.

 

संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा व महाराष्ट्र काँग्रेसच्या सरचिटणीस सुमन आर. अग्रवाल यांच्या संयोजनाखाली पार पडलेल्या या भव्य सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी चुरू (राजस्थान) येथील नवनिर्वाचित आमदार व आंतरराष्ट्रीय एथलीट पद्मश्री कृष्णा पुनिया आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस बी. एम. संदीप प्रमुख पाहुणे म्हणून तर महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस गणेश पाटील, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे, उल्हासनगर काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला विशेष पाहुणे होते.

सोहळ्याची सुरूवात पारंपरिक शैलीतील गणेश वंदनेच्या समूहनृत्याने झाली. सदर सोहळ्यात ज्येष्ठ समाजसेवी-उद्योगपती सत्यनारायण बजाज यांना संस्थेच्या वतीने या वर्षाचे प्रतिष्ठित ‘मारवाड़ रत्न’ व अनिता टिबरेवाल यांना ‘महिला उद्योगरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योगपती-समाजसेवक दीनदयाल मुरारका, रमाकांत परसरामपुरिया, एस. एल. पोखरणा, राधेश्याम अग्रवाल, अमर ठाकुर, एल. व्ही. राठी, विक्रम जैन, संदीप गर्ग, डॉ. राजेंद्र अग्रवाल, शिवकांत खेतान, महेश बंसीधर अग्रवाल, विकास केडिया, सुरेंद्र रूइया, ब्रिज मित्तल, उत्तम जैन, सुरेश राठोड, चंचल झंवर, अभिनेत्री गरिमा जैन, सीमा नैयर, प्रजापिता ब्रह्मकुमारी समाजच्या लतिका दिदी आणि टाइम्स एंड ट्रेंड्स एकेडमीच्या संचालिका निकीता अग्रवाल, विरेंद्र पुनिया आदी उपस्थित होते.”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content