HomeArchiveआता सगळेच सापडणार...

आता सगळेच सापडणार `बार’मध्ये!

Details

 

 
 
विनय गजानन खरे
 ज्येष्ठ पत्रकार
 
 
देशाची राजधानी दिल्लीतील प्रदूषण कमी होण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळे अनेक आजार तिथे उद्भवत आहेत. हे वायू प्रदूषण होतेय ते प्रामुख्याने वाहन नि शेतातील धान्याची ताटं जाळल्याने! यावर आता आला आहे उपाय ‘ऑक्सिजन बार’! शुद्ध हवेचा श्वास घ्यायचा असेल तर २९९ रूपये देऊन १५ मिनिटे तुम्ही शुद्ध हवा घेऊन ताजेतवाने होऊ शकता. दिल्लीत हा बार सुरू होत आहे.

 
“दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या समस्येवर प्रभावी उपाय करण्यासाठी हायड्रोजन आधारित जापनी तंत्र वापरण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्यास सांगितले आहे. गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा दिल्लीची परिस्थिती गंभीर बनली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्वतः याकडे लक्ष वेधल्याने दिल्ली, यु. पी.सह इतर राज्यात याच्या वापराची शक्यता तपासण्यास मुख्य न्या. रंजन गोगोई नि न्या. शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला सांगितले आहे.”
 
 
जपान विद्यापीठाने एनसीआर नि यु. पी.मधील वायू प्रदूषणाच्या स्थितीचा अभ्यास केला आहे. हा शोध पूर्णतः नवीन असून हे तंत्र यासाठी वापरता येईल. संशोधक विश्वनाथ जोशी यांचा न्यायालयाला परिचय करून देत त्यांच्याकडून हायड्रोजन तंत्रामुळे प्रदूषण संपू शकते असे त्यांनी सांगितले.
 
 
“जीवघेण्या वायू प्रदूषणामुळे दिल्लीची अवस्था बिकट होत आहे. यावर नोबल पुरस्कार विजेता रोनाल्ड कॉस यांनी एक उपाय सुचवला आहे. त्यात धान्याची ताटं जाळण्यासाठी पर्याय दिला आहे. यासाठी २० हजार कोटी खर्च करून दोन लाख कोटी रूपयाची हानी थांबवता येईल. शेतकरी नि सरकार मिळून एक करार करावा, बाजूच्या सरकारांनी शेतकरी जी धान्य ताटे आपला खर्च कमी करण्यासाठी जाळतात तितकी रक्कम सरकारने त्यांना द्यावी.”
 
 
ताज्या बातमीनुसार लगतच्या पंजाब राज्यातील पठाणकोट जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागोपाठ चौथ्यांदा प्रदूषणरहित जिल्हा असा सन्मान मिळवला आहे. धान्य भुसा नि ताटं जाळण्याच्या प्रकारात घट झाली आहे. याबाबत जागरूकता येण्यासाठी तेथील कृषी विभागाने सर्व स्तरावर मोहीम राबवली. सदर जिल्ह्यात २७ हजार हेक्टरवर ८० हजार मे. टन होणाऱ्या उत्पादनाने दीड लाख मे. टन ताटं नि भुसा तयार होतो. त्याच्या विक्रीपोटी ४२०० रूपये हेक्टरप्रमाणे ११२ कोटी ८ लाख ७५ हजार रूपये शेतकऱ्यांनी कमावले. ही रक्कम शेतकरी गहू लागवडीवर खर्च करणार आहेत.
 
 
“याच्या एक टन जळण्याने चारशे किलो जैविक कार्बन, ५.५ किलो नायट्रोजन, २.३ किलो फॉस्फरस, २५ किलो पोटॅश, १.२ किलो सल्फर नि मातीतील सूक्ष्म जीवांचा नाश होतो. यासह अनेक विषारी वायू तयार होऊन श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची आग होणे, त्वचा रोग आदींचा धोका वाढतो, असे कृषी तज्ज्ञ डॉ. अमरिक सिंह यांनी सांगितले. बॅगासपासून होणारी वीज निर्मिती, पशु खाद्य, प्लायवूड निर्मिती असा याचा उपयोग होऊ शकतो. शेतकरी गट स्थापन करून जिल्हा प्रशासनाने दहा मशिनरी बँक स्थापन केल्या. त्यातून ८०% अनुदानावर त्या उपयोगासाठी दिल्या जातात. याच्या समूळ उच्चटनासाठी पी ए यु हॅप्पीसिडर, मल्चर, चॉपर, ताटं कापण्यासाठी, पसरवण्यासाठी मशीन दिल्या जातात. त्या महाग असल्याने एकटा शेतकरी खरेदी करू शकत नाही. जिल्हाधिकारी रामबीर यांनी ५७० शेतकऱ्यांना अनुदान रक्कम नि प्रमाणपत्र देत सन्मानित केले. यावेळी अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.”
 
 
 
 
 
सरकार देणार अडीच हजार रूपये
 
 
“धान्य अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाब सरकारने प्रति एकर अडीच हजार रूपये मोबदला देण्याचे ठरविले आहे. कृषी सचिव काहन सिंह पननु यांच्यानुसार बासमतीशिवाय अन्य लागवड नि पाचएकपर्यंत हा लाभ दिला जाईल. मात्र, त्याने आपल्या शेतात कोणत्याही भागात आग लावली नसावी ही अट असेल. यासाठी ग्रामपंचायतमध्ये त्याने स्वघोषणापत्रात मागितलेली माहिती नोव्हेंबरअखेर द्यावी. तथापि, धानाच्या कोणत्याही आग लावू नये, हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरेल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.”

Continue reading

बंगालमध्ये सुवेंदू अधिकारींचा पीए गोळीबारात ठार! कारचालकही जखमी!!

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे पानीपत झाल्यानंतर उफाळलेल्या हिंसाचारात बुधवारी रात्री उशिरा ममता बॅनर्जी यांना भवानीपूर मतदारसंघात पराभूत करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते व मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार झाला....

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भूमिगत मेट्रो स्थानकात आग

मुंबई मेट्रो लाईन ३ (अ‍ॅक्वा लाईन)च्या 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' या भूमिगत स्थानकावर बुधवारी सायंकाळी आगीची मोठी घटना घडली. स्थानकाच्या तांत्रिक विभागातील सरकत्या जिन्याजवळ अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन...

शशी शेखर वेम्पती सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष

केंद्र सरकारने शशी शेखर वेम्पती यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्ड (सीबीएफसी) च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ६ मे २०२६ रोजीच्या अधिसूचनेत ही घोषणा केली. शशी शेखर वेम्पति हे पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून तीन...
Skip to content