HomeArchiveअटल स्मृती उद्यान...

अटल स्मृती उद्यान तरूण पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Details
अटल स्मृती उद्यान तरूण पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशात नवभारताची संकल्पना रूजविली. आज दिसणाऱ्या विकासाचा पाया अटलजींनी रचला आहे. त्यांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्त्व तरूण पिढीला प्रेरणा देण्यासाठी अटल स्मृती उद्यान उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी व्यक्त केला.

 
बोरिवली येथे उभारण्यात आलेल्या अटल स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री योगेश सागर, राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार भाई गिरकर, प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी आदी उपस्थित होते.
 
अटल स्मृती उद्यान हे श्रद्धेय अटलजींची सर्वोत्तम स्मृती आहे. या उद्यानांतून ते आपल्यात आहेत असाच भास होतो. अटलजींचे व्यक्तिमत्त्व हे निस्पृह, कणखर आणि अतुलनीय कटिबंधता असणारे आहे. अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सर्वाधिक विकास दर होता. त्यांनी सुरू केलेला विकासाचा सपाटा आजही सुरू आहे, असे ते म्हणाले.
 
अटल स्मृती उद्यानाजवळ होणाऱ्या मेट्रो स्थानकास या उद्यानाचे नाव द्यावे, अशी मागणी तावडे यांनी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून या स्थानकास अटल स्मृती उद्यान मेट्रो स्थानक असे नाव देण्यासंबंधी मेट्रो कार्पोरेशनला कळविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अटल बिहारी वाजपेयी हे आदरणीय व्यक्तिमत्व होते. अशा व्यक्तिमत्वाकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्यांचे प्रत्येक भाषण, विचार हे पुढील पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे काम या उद्यानाच्या माध्यमातून होणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशात नवभारताची संकल्पना रूजविली. आज दिसणाऱ्या विकासाचा पाया अटलजींनी रचला आहे. त्यांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्त्व तरूण पिढीला प्रेरणा देण्यासाठी अटल स्मृती उद्यान उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी व्यक्त केला.

 
बोरिवली येथे उभारण्यात आलेल्या अटल स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री योगेश सागर, राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार भाई गिरकर, प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी आदी उपस्थित होते.
 
अटल स्मृती उद्यान हे श्रद्धेय अटलजींची सर्वोत्तम स्मृती आहे. या उद्यानांतून ते आपल्यात आहेत असाच भास होतो. अटलजींचे व्यक्तिमत्त्व हे निस्पृह, कणखर आणि अतुलनीय कटिबंधता असणारे आहे. अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सर्वाधिक विकास दर होता. त्यांनी सुरू केलेला विकासाचा सपाटा आजही सुरू आहे, असे ते म्हणाले.
 
अटल स्मृती उद्यानाजवळ होणाऱ्या मेट्रो स्थानकास या उद्यानाचे नाव द्यावे, अशी मागणी तावडे यांनी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून या स्थानकास अटल स्मृती उद्यान मेट्रो स्थानक असे नाव देण्यासंबंधी मेट्रो कार्पोरेशनला कळविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अटल बिहारी वाजपेयी हे आदरणीय व्यक्तिमत्व होते. अशा व्यक्तिमत्वाकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्यांचे प्रत्येक भाषण, विचार हे पुढील पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे काम या उद्यानाच्या माध्यमातून होणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 ”
 
 
 
 

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content