HomeArchiveअटल स्मृती उद्यान...

अटल स्मृती उद्यान तरूण पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Details
अटल स्मृती उद्यान तरूण पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशात नवभारताची संकल्पना रूजविली. आज दिसणाऱ्या विकासाचा पाया अटलजींनी रचला आहे. त्यांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्त्व तरूण पिढीला प्रेरणा देण्यासाठी अटल स्मृती उद्यान उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी व्यक्त केला.

 
बोरिवली येथे उभारण्यात आलेल्या अटल स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री योगेश सागर, राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार भाई गिरकर, प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी आदी उपस्थित होते.
 
अटल स्मृती उद्यान हे श्रद्धेय अटलजींची सर्वोत्तम स्मृती आहे. या उद्यानांतून ते आपल्यात आहेत असाच भास होतो. अटलजींचे व्यक्तिमत्त्व हे निस्पृह, कणखर आणि अतुलनीय कटिबंधता असणारे आहे. अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सर्वाधिक विकास दर होता. त्यांनी सुरू केलेला विकासाचा सपाटा आजही सुरू आहे, असे ते म्हणाले.
 
अटल स्मृती उद्यानाजवळ होणाऱ्या मेट्रो स्थानकास या उद्यानाचे नाव द्यावे, अशी मागणी तावडे यांनी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून या स्थानकास अटल स्मृती उद्यान मेट्रो स्थानक असे नाव देण्यासंबंधी मेट्रो कार्पोरेशनला कळविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अटल बिहारी वाजपेयी हे आदरणीय व्यक्तिमत्व होते. अशा व्यक्तिमत्वाकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्यांचे प्रत्येक भाषण, विचार हे पुढील पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे काम या उद्यानाच्या माध्यमातून होणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशात नवभारताची संकल्पना रूजविली. आज दिसणाऱ्या विकासाचा पाया अटलजींनी रचला आहे. त्यांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्त्व तरूण पिढीला प्रेरणा देण्यासाठी अटल स्मृती उद्यान उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी व्यक्त केला.

 
बोरिवली येथे उभारण्यात आलेल्या अटल स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री योगेश सागर, राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार भाई गिरकर, प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी आदी उपस्थित होते.
 
अटल स्मृती उद्यान हे श्रद्धेय अटलजींची सर्वोत्तम स्मृती आहे. या उद्यानांतून ते आपल्यात आहेत असाच भास होतो. अटलजींचे व्यक्तिमत्त्व हे निस्पृह, कणखर आणि अतुलनीय कटिबंधता असणारे आहे. अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सर्वाधिक विकास दर होता. त्यांनी सुरू केलेला विकासाचा सपाटा आजही सुरू आहे, असे ते म्हणाले.
 
अटल स्मृती उद्यानाजवळ होणाऱ्या मेट्रो स्थानकास या उद्यानाचे नाव द्यावे, अशी मागणी तावडे यांनी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून या स्थानकास अटल स्मृती उद्यान मेट्रो स्थानक असे नाव देण्यासंबंधी मेट्रो कार्पोरेशनला कळविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अटल बिहारी वाजपेयी हे आदरणीय व्यक्तिमत्व होते. अशा व्यक्तिमत्वाकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्यांचे प्रत्येक भाषण, विचार हे पुढील पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे काम या उद्यानाच्या माध्यमातून होणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 ”
 
 
 
 

Continue reading

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....

17 मार्चला मुंबईत टपाल पेन्शन अदालत

मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांनी टपाल विभागातल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंब वेतनधारकांसाठी येत्या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत घेतली जाईल. महाराष्ट्र आणि...

तत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात 7 तारखेला विशेष मोहीम

पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर मिळवून देण्यासाठी आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा...
Skip to content