Homeमुंबई स्पेशलमुख्यमंत्र्यांचे निर्देश, केईएम...

मुख्यमंत्र्यांचे निर्देश, केईएम रूग्णालयातील काम १२ तासांत सुरू

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयातील सहा वॉर्डांच्या संपूर्ण नूतनीकरणाच्या कामांना युद्धपातळीवर प्रारंभ करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयातील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी सोमवारी मध्यरात्री भेट दिल्यानंतर या सहा वॉर्डांचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार युद्धपातळीवर म्हणजे १२ तासांच्या आत या कामांना सुरूवात झाली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी रुग्णालयांमधील विविध व्यवस्थांची तसेच विभागांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले होते. तसेच सहा वॉर्डांचे नूतनीकरण तातडीने सुरू करुन ही कामे पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही भेटीदरम्यान केल्या होत्या. या आदेशानुसार तत्काळ याठिकाणी काम सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आणि या सहाही वॉर्डमधील नूतनीकरण सुरू झाले.

या सहा वॉर्डच्या कामांमध्ये स्थापत्य, विद्युत, नवीन फर्निचर आणि वैद्यकीय प्राणवायू वाहिनी (मेडिकल ऑक्सिजन पाईपलाईन) यासारखी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी बांधकामाच्या किरकोळ कामांना काल सुरूवात झाली. ही कामे वेगाने व्हावीत मात्र, त्याचवेळी त्यांचा रुग्णांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने दिवसरात्र काम करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केल्या आहेत. यामध्ये वॉर्ड क्रमांक ४, ४अ, ६, ७, ११ आणि १२ या सहा वॉर्डचा समावेश आहे. याआधी या प्रत्येक वॉर्डचे काम स्वतंत्रपणे करण्याचे नियोजित होते. तथापि, रुग्णशय्या पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर उपयोगात याव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आता संपूर्ण सहा वॉर्डचे काम एकाचवेळी हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

या प्रत्येक वॉर्डमध्ये ६० ते ७० इतकी रूग्णसेवा देण्याची क्षमता आहे. नूतनीकरणानंतर या सहा वॉर्डच्या उपलब्धततेमुळे सुमारे ४२० रूग्णांना उपचार देण्याची वाढीव क्षमता निर्माण होणे शक्य होईल. परिणामी रूग्णालयाच्या सुविधांमध्ये भर पडतानाच अधिक गुणवत्तापूर्ण सुविधा रूग्णांसाठी उपलब्ध करून देता येतील, असेही ते म्हणाले.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content