Homeचिट चॅटईश्वरसेवा समजून काम...

ईश्वरसेवा समजून काम करूया – अविनाश दौंड

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना जगाला हेवा वाटेल असा पुरोगामी महाराष्ट्र घडविणारे थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०५ हुतात्मे आणि जगभरातील लक्षावधी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शाहिद झालेले कामगार कार्यकर्ते, कामगार नेते यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन करून बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी कोरोनाच्या या काळात साधनसामुग्रीचा तुटवडा असला तरी रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा समजून सर्वोत्तम सेवा द्यावी, असे आवाहन सरकारी कर्मचाऱ्यांना केले आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत देशस्थिती अतिशय भयावह झाली असून देशात आरोग्य आणिबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात रोज ६५ ते ७० हजार नवीन रुग्ण आढळत असून दुर्दैवाने रोज ५०० नागरिक बळी पडत आहेत. मुंबईत तर उद्रेक झाला असून रुग्णालयात बेड, ऑॅक्सिजन, इंजेक्शन, लस यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या १६ महिन्यांत कोरोनाशी लढताना हजारो शासकीय कर्मचारी, प्रामुख्याने आरोग्य सेवक, पोलीस, वाहक, चालक यांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या वारसांना तातडीने ५० लक्ष विमा रक्कम आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.

कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या शासन दरबारी बराच काळ प्रलंबित आहेत आणि पुढील काळात त्यासाठी संघर्षसुद्धा करावा लागणार आहे. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आजच्या कठीण काळात कर्मचाऱ्यांनी शासनाला तन, मन आणि धनाने सहकार्य केले पाहिजे. यापुढे समाज माध्यमांवर व्यक्त होताना आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. संपूर्ण जिल्ह्यात एकमेकांशी कायम संपर्कात राहून अभावग्रस्तांना सर्वतोपरी मदत करावी. याकामी राहत्या ठिकाणीसुद्धा पुढाकार घ्यावा. तसेच अनेक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोना होऊन ते बरे झाले आहेत. अशांनी लस घेण्यापूर्वी प्लाझ्मा द्यावा देण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही दौंड यांनी केले आहे.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content