Homeएनसर्कलपदोन्नतीतल्या आरक्षणावर कोण...

पदोन्नतीतल्या आरक्षणावर कोण नमते घेणार?

पदोन्नतीतले आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उपसमितीच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. सत्तेतल्या काँग्रेसने या निर्णयाला ठाम विरोध केला असून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे या विषयावर नेमके कोण माघार घेणार आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने सात मे रोजी शासननिर्णय जारी करून पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले होते. काँग्रेसचे नेते डॉ. नितीन राऊत यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस, हा निर्णय मागे घ्यायला सरकारला भाग पाडेल, असे जाहीर केले. राज्य मंत्रिमंडळातही राऊत यांनी हा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे त्यांना बोलूच देण्यात आले नाही.

पदोन्नती

त्यावेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक झाली. त्यात नितीन राऊत, वर्षा गायकवाड आदी मंत्री सहभागी झाले होते. मात्र, सुमारे तासभर झालेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी यातून मार्ग काढला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीनंतर नवाब मलिक तसेच छगन भुजबळ या मंत्र्यांनीही पदोन्नतीतील आरक्षणाच्या विषयावर मार्ग काढला जाईल, असे सांगितले.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content