Homeपब्लिक फिगरथकलेले कोट्यवधींचे भाडे...

थकलेले कोट्यवधींचे भाडे मिळणार तरी कधी?

मुंबईतल्या वांद्रे पूर्व परिसरातील गोळीबार एसआरए योजनेतील प्रकल्पग्रस्त गरीबांना त्यांचे थकलेले कोट्यवधी रूपयांचे भाडे कधी मिळणार, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे सदस्य नितेश राणे यांनी आज विधानसभेत केला.

झिशान सिद्दीकी यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उपप्रश्न विचारताना नितेश राणे म्हणाले की, कोट्यवधी रूपयांचे भाडे थकवण्याइतकी वाईट परिस्थिती सदर विकासकाची नाही. हा लहान बिल्डर नाही. सध्याची मार्केटची स्थिती त्याला लागू पडत नाही. त्याचे अन्य प्रोजेक्ट चालू आहेत. प्रकल्पग्रस्तांचे भाडे थकवणे ही या बिल्डरची मस्ती आहे. त्यामुळे तातडीने त्यावर कारवाई करून त्याला भाडे देण्यास भाग पाडावे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्याला उत्तर दिले. याबाबत आपण लवकरात लवकर विकासक, म्हाडा तसेच एसआरएचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक बोलावू आणि प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर थकलेले भाडे देण्यास भाग पाडू, असे आश्वासन त्यांनी दिले.

त्याआधी झिशान सिद्दीकी यांनी कित्येक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी विकासक बदलण्याची तसेच प्रकल्पग्रस्त भाडेकरूंचे थकलेले सुमारे १२ कोटी भाडे देण्यास विकासकाला भाग पाडण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना आव्हाड यांनी सांगितले की, ३-के नियमाखाली सुरू झालेल्या काही सुरूवातीच्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. तो रद्द करणे योग्य होणार नाही. निश्चित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तसेच प्रकल्पग्रस्तांना त्यांचे थकलेले भाडे मिळण्यासाठी आपण एक संयुक्त बैठक बोलावू.

एसआरए व म्हाडाची गंगाजळी रिकामी

आशिष शेलार यांनी हा प्रकल्प एसआरएने पूर्ण करावा. तसेच इतरत्रही रखडलेल्या प्रकल्पांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. त्याला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, नवे प्रकल्प राबविण्याची ताकद एसआरएकडे नाही. म्हाडाही, याला दे, त्याला दे करत रिकामी झाली आहे. अशा स्थितीत एक नवा प्रयोग करण्याचा आमचा विचार आहे. अशा योजना म्हाडा आणि एसआरए एकत्रितपणे राबवतील. प्रकल्पग्रस्तांसाठी लागणाऱ्या इमारतींचे बांधकाम म्हाडा आणि एसआरए करेल आणि विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या जागेचा लीलाव केला जाईल. वांद्रे ते कुलाब्याच्या बधवार पार्कपर्यंत अशाप्रकारे योजना राबविल्या जातील. त्यामुळे म्हाडा आणि एसआरएकडे भरपूर पैसा येईल.

योगेश सागर यांनी, असा प्रयोग करताना आपले मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. सावध राहवे, असा सल्ला दिला आणि एकच हंशा पिकला.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content