Homeपब्लिक फिगरथकलेले कोट्यवधींचे भाडे...

थकलेले कोट्यवधींचे भाडे मिळणार तरी कधी?

मुंबईतल्या वांद्रे पूर्व परिसरातील गोळीबार एसआरए योजनेतील प्रकल्पग्रस्त गरीबांना त्यांचे थकलेले कोट्यवधी रूपयांचे भाडे कधी मिळणार, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे सदस्य नितेश राणे यांनी आज विधानसभेत केला.

झिशान सिद्दीकी यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उपप्रश्न विचारताना नितेश राणे म्हणाले की, कोट्यवधी रूपयांचे भाडे थकवण्याइतकी वाईट परिस्थिती सदर विकासकाची नाही. हा लहान बिल्डर नाही. सध्याची मार्केटची स्थिती त्याला लागू पडत नाही. त्याचे अन्य प्रोजेक्ट चालू आहेत. प्रकल्पग्रस्तांचे भाडे थकवणे ही या बिल्डरची मस्ती आहे. त्यामुळे तातडीने त्यावर कारवाई करून त्याला भाडे देण्यास भाग पाडावे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्याला उत्तर दिले. याबाबत आपण लवकरात लवकर विकासक, म्हाडा तसेच एसआरएचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक बोलावू आणि प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर थकलेले भाडे देण्यास भाग पाडू, असे आश्वासन त्यांनी दिले.

त्याआधी झिशान सिद्दीकी यांनी कित्येक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी विकासक बदलण्याची तसेच प्रकल्पग्रस्त भाडेकरूंचे थकलेले सुमारे १२ कोटी भाडे देण्यास विकासकाला भाग पाडण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना आव्हाड यांनी सांगितले की, ३-के नियमाखाली सुरू झालेल्या काही सुरूवातीच्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. तो रद्द करणे योग्य होणार नाही. निश्चित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तसेच प्रकल्पग्रस्तांना त्यांचे थकलेले भाडे मिळण्यासाठी आपण एक संयुक्त बैठक बोलावू.

एसआरए व म्हाडाची गंगाजळी रिकामी

आशिष शेलार यांनी हा प्रकल्प एसआरएने पूर्ण करावा. तसेच इतरत्रही रखडलेल्या प्रकल्पांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. त्याला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, नवे प्रकल्प राबविण्याची ताकद एसआरएकडे नाही. म्हाडाही, याला दे, त्याला दे करत रिकामी झाली आहे. अशा स्थितीत एक नवा प्रयोग करण्याचा आमचा विचार आहे. अशा योजना म्हाडा आणि एसआरए एकत्रितपणे राबवतील. प्रकल्पग्रस्तांसाठी लागणाऱ्या इमारतींचे बांधकाम म्हाडा आणि एसआरए करेल आणि विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या जागेचा लीलाव केला जाईल. वांद्रे ते कुलाब्याच्या बधवार पार्कपर्यंत अशाप्रकारे योजना राबविल्या जातील. त्यामुळे म्हाडा आणि एसआरएकडे भरपूर पैसा येईल.

योगेश सागर यांनी, असा प्रयोग करताना आपले मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. सावध राहवे, असा सल्ला दिला आणि एकच हंशा पिकला.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content