Homeडेली पल्ससुलेखनकार अच्युत पालव...

सुलेखनकार अच्युत पालव यांना जीवनगौरव पुरस्कार

प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार सोहळा बनारस हिंदू विश्वविद्यालयात नुकताच संपन्न झाला. आयआयटी, आयडीसी आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड आर्ट यांनी आयोजित केलेल्या ‘टायपो डे’ या आंतरराष्ट्रीय टायपोग्राफी सेमिनारमध्ये सुलेखनातील सेवेचा गौरव म्हणून अच्युत पालव यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आयडीसीचे प्रा. रवि पोवय्या, प्रा. श्रीकुमार, बीएचयुचे प्रा. मनीष अरोरा, अजंता सेन तसेच देशातील आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे टायपोग्राफर आणि कॅलिग्राफर उपस्थित होते.

अच्युत पालव यांनी 1973 साली शिरोडकर हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक परशुराम नाबर यांच्या मार्गदर्शनाखाली फलक लेखनाला सुरूवात केली. पुढे त्यांनी जेजे इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये प्रवेश घेतला. एका लेक्चरदरम्यान त्यांची ज्येष्ठ सुलेखनकार र. कृ. जोशी यांची भेट झाली आणि पालवांची अक्षरांकडे पाहण्याची दृष्टी बदलून गेली. चौथ्या अन पाचव्या वर्षासाठी लेटरिंग टायपोग्राफी अन कॅलिग्राफी स्पेशल विषय घेऊन प्रथम वर्गात ते उत्तीर्ण झाले.

पुढे उल्का ऍडव्हर्टायझिंगची संशोधन करण्याकरीता असलेली शिष्यवृत्ती मिळाली. मोडी लिपीवर भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर, इतिहासतज्ज्ञ डॉ. ग. ह. खरे, ज्येष्ठ चित्रकार, इतिहासाचे अभ्यासक द. ग. गोडसे आणि र. कृ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्षं अभ्यास करून ‘मोडी लिपी – 15 ते 18वे शतक’ असा प्रबंध त्यांनी सादर केला. देवनागरी आणि मोडी लिपी यांच्या समन्वयातून मुक्त लिपी निर्माण केली आणि महाराष्ट्र राज्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध केलेल्या “आपला महाराष्ट्र” या पुस्तकासाठी वापरली. याच दरम्यान आयआयटी, आयडीसी, पवई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये प्रात्याक्षिक करण्याची संधी मिळाली आणि पालवांच्या कामाने जगाचे लक्ष वेधून घेतले.

देवनागरी आणि मोडी लिपी शिकविण्याकरिता जर्मनी, लंडन आणि नेंदरलँडमधून आमंत्रण मिळाली आणि आज जगभर देवनागरीची पताका घेऊन ते फिरत आहेत. 3 महिन्यांपूर्वी 80 रशियन मुलांना त्यांनी देवनागरीचे धडे दिले. मॉस्कोसारख्या शहरात प्रदर्शन घडवून आणलं. 2007 साली काश्मीर ते कन्याकुमारी असा दौरा करून देशभरात सुलेखनाचं महत्त्व पटवून देण्यात पालवांचा मोठा हात आहे. कॅलिफेस्टसारखे भारतीय लिप्यांचे उत्सव त्यांनी सुरू केले आणि देशातील सुलेखनकारांना एकत्र आणले. भारत हा शेतीप्रधान देश असला तरी तो लिपीप्रधानदेखील आहे याची जाणीव आजच्या तरुण पिढीला करुन दिली. त्यामुळे देशातील लिपी आणि अक्षरसौंदर्य जगाला दिसेल. अच्युत पालव यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार तसेच मानसन्मान मिळाले असून जगातल्या बऱ्याच म्युझियमने त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content