Homeपब्लिक फिगरआपली जनतेशी बांधिलकी...

आपली जनतेशी बांधिलकी – जयंत पाटील

सत्तेत आलो म्हणजे हातावर घडी घालून बसू नका.. आपली जनतेशी बांधिलकी आहे ती अधिकाधिक मजबूत करण्याचे काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भंडारा जिल्हयातील साकोली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना केले.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा आजचा तिसरा दिवस असून भंडारा जिल्हयातील साकोली विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीने दौर्‍याची सुरुवात झाली. आजही भंडारा येथे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करून लोकांना शरद पवारसाहेबांच्या विचारांकडे आकर्षित करण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे मार्गदर्शनही जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. दूर्गम भागातही लोक रात्री उशिरापर्यंत आढावा बैठकांना उपस्थित राहत आहेत. या परिवाराचा आणखी विस्तार करायचा आहे म्हणून हा राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भंडारा भागातील लोकांसाठी राष्ट्रवादीने असंख्य कामे केली आहेत. खासदार प्रफुल पटेल यांनी धानाला जास्तीची किंमत मिळवून दिली आहे. मागे झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई राष्ट्रवादीने शासनाच्या माध्यमातून मिळवून दिली याची आठवण पाटील यांनी करुन दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री विलासभाऊ शृंगारपवार, माजी आमदार राजू जैन, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, पक्षाचे नेते धनंजय दलाल, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Continue reading

युद्धबंदीमुळे इस्रायलने टाळले रोजचे 17 अब्ज रुपयांचे नुकसान!

इस्त्रायल-इराण युद्धात आतापर्यंत इराणला मोठं मानवी आणि आर्थिक नुकसान झालं आहे. इराणच्या सरकारी आकडेवारीनुसार 430 नागरिक मृत तर 3,000 जखमी आहेत. एका स्वतंत्र संस्थेनुसार एकूण 722 मृत असून त्यात 200 लष्करी जवान, अधिकारी आहेत. दुसरीकडे, मानवहानी कमी झाली असली...

इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर

इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी या ज्वालामुखीच्या ताज्या उद्रेकामुळे मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून खालील गोष्टी दिसून येत आहेत.  1. बालीसह अनेक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द किंवा विलंबित झाली आहेत.  2. ज्वालामुखीच्या...

कोरेगावचा योगगुरू देतोय व्हिएतनाममध्ये योगाचे धडे!

साताऱ्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील गणेश गोपीनाथ खताळ व्हिएतनाममध्ये योगगुरू बनला असून तिथल्या नागरिकांना योगाचे धडे देतोय. शेतकरी कुटुंबातील गणेशची गोष्ट एकदम प्रेरणादायक आहे! गणेशचा जन्म कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला; त्याला लहानपणी शाळेत असताना योगाची...
Skip to content