Homeमुंबई स्पेशलफिल्टरपाड्यातल्या नाल्याचे पाणी...

फिल्टरपाड्यातल्या नाल्याचे पाणी मिळते ८० रूपये बादली!

मुंबईतील गोरेगाव नजीकच्या आरे कॉलनीच्या फिल्टरपाड्यातून एक नाला वाहतो. तो पवईकडे जातो. हा नाला वाहत असताना आपल्याबरोबर गाळ आणि घाण नेत असतो. पण या नाल्याच्या एका टोकाला एका महिला नाला अडवून त्यातील पाणी अर्थात घाणीसह एका खड्ड्यात जमा करून ठेवते, अशी माहिती हाती आली आहे. अर्थात खड्ड्यात जमवलेले पाणी काही काळ स्थिर झाल्याने अगदी थोड्या वेळातच ते स्वच्छ दिसू (पाण्याचा तो गुणधर्मच असतो) लागते. येथे दुसरा अंक सुरु होतो. हे जमा झालेले नाल्याचे पाणी एका बादलीस (मध्यम आकाराची) रुपये ८० फक्त, या दाराने ही महिला दिवसभर विकत असते.

फिल्टर पाडा किंवा कुठल्याही झोपडपट्टीत पाणीटंचाई ही नेहमीचीच असते. हे पाणी पवईजवळील एल अँड टी चौक परिसरात असलेल्या खाऊ गल्लीतील टपऱ्या विकत घेऊन खाद्यपदार्थ बनवून विकत असतात. संतापजनक बाब म्हणजे या फिल्टर पाड्यानजीकच पवईकडे जाताना मुंबई महापालिकेच्या पाणी विभागाचे प्रमुख कार्यालय आहे. या व्हिडीओत उभी असलेली बाईक दिसत असून त्याच्यापासून पाऊलभर अंतरावरच हा पाणी साठवण्याचा खड्डा आहे. वनराई पोलीसठाणे, पवई पोलीसठाणे आणि महापालिका प्रशासन याविरुद्ध काही कारवाई करेल या आशेने नागरिक दिवस काढत आहेत. विशेष माहिती हाती आली की, फिल्टरपाड्यात काहीही घडले की कारवाई होवो. किंवा न होवो वनराई व पवई पोलीसठाणे हद्दीचा वाद जरूर निर्माण करतात व या वादानेच समाजकंटकांचे फावते असे आरे कॉलनीतील अनेक. नागरिकांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Continue reading

खरंतर हिंदीभाषिकांनी इतर राज्यांच्या भाषा शिकाव्यात!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील नवे सरकार राज्यात आल्यापासून हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय सुरु झाला आहे हे कुणीही अमान्य करणार नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषा इंग्रजी व हिंदीचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. काही प्रमाणात ते ठीकही आहे. परंतु हिंदी...

ठाण्यात चाललाय बिनपैशाचा राजकीय ‘तमाशा’!

गेले दीड-दोन महिने ठाणे शहर आणि ठाणे पोलीस आयुक्तालायाच्या परिक्षेत्रात वाटेल तिथे उभ्या असलेल्या गाड्या खेचून (टोईंग) नेण्यावरून बिनकामाचे आंदोलन सुरु आहे. आश्चर्य म्हणजे या आंदोलनात सत्तारूढ राजकीय पक्षच आघाडीवर दिसत आहे. खरेतर या सर्व राजकीय पक्षांनी आंदोलनाच्या फंदात...

सायनला मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी चालून दाखवावेच!

"मुकी बिचारी कुणीही आणि 'कशीही' हाका..." मुंबईच्या शीव (सायन) येथील जुना पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरु झाले आहे. हा पूल पाडण्याआधी जनतेला त्रास होईल, वाहतुकीचे काय होईल आदी अनेक प्रश्न घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी एकच कल्ला केला होता,...
Skip to content