Thursday, April 17, 2025
Homeमुंबई स्पेशलफिल्टरपाड्यातल्या नाल्याचे पाणी...

फिल्टरपाड्यातल्या नाल्याचे पाणी मिळते ८० रूपये बादली!

मुंबईतील गोरेगाव नजीकच्या आरे कॉलनीच्या फिल्टरपाड्यातून एक नाला वाहतो. तो पवईकडे जातो. हा नाला वाहत असताना आपल्याबरोबर गाळ आणि घाण नेत असतो. पण या नाल्याच्या एका टोकाला एका महिला नाला अडवून त्यातील पाणी अर्थात घाणीसह एका खड्ड्यात जमा करून ठेवते, अशी माहिती हाती आली आहे. अर्थात खड्ड्यात जमवलेले पाणी काही काळ स्थिर झाल्याने अगदी थोड्या वेळातच ते स्वच्छ दिसू (पाण्याचा तो गुणधर्मच असतो) लागते. येथे दुसरा अंक सुरु होतो. हे जमा झालेले नाल्याचे पाणी एका बादलीस (मध्यम आकाराची) रुपये ८० फक्त, या दाराने ही महिला दिवसभर विकत असते.

फिल्टर पाडा किंवा कुठल्याही झोपडपट्टीत पाणीटंचाई ही नेहमीचीच असते. हे पाणी पवईजवळील एल अँड टी चौक परिसरात असलेल्या खाऊ गल्लीतील टपऱ्या विकत घेऊन खाद्यपदार्थ बनवून विकत असतात. संतापजनक बाब म्हणजे या फिल्टर पाड्यानजीकच पवईकडे जाताना मुंबई महापालिकेच्या पाणी विभागाचे प्रमुख कार्यालय आहे. या व्हिडीओत उभी असलेली बाईक दिसत असून त्याच्यापासून पाऊलभर अंतरावरच हा पाणी साठवण्याचा खड्डा आहे. वनराई पोलीसठाणे, पवई पोलीसठाणे आणि महापालिका प्रशासन याविरुद्ध काही कारवाई करेल या आशेने नागरिक दिवस काढत आहेत. विशेष माहिती हाती आली की, फिल्टरपाड्यात काहीही घडले की कारवाई होवो. किंवा न होवो वनराई व पवई पोलीसठाणे हद्दीचा वाद जरूर निर्माण करतात व या वादानेच समाजकंटकांचे फावते असे आरे कॉलनीतील अनेक. नागरिकांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Continue reading

म्हणे काही सेकंदांत दुसरी लोकल येणार!

गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मुंबई भेटी वाढल्या आहेत. बरोबरच आहे, येत्या काही महिन्यांत (सहा महिन्यांत) मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांच्या भेटीबाबत आक्षेप घेण्याचे कारणच नाही, कारण त्यामुळे का होईना निदान काही...

‘माईंड युअर बिझिनेस’ सांगणारे पवार व ‘ऑफ द रेकॉर्ड’ सांगणारे सचिव!

संध्याकाळच्या चार वाजण्याच्या सुमारास मंत्रालय प्रवेशाचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर आस्मादिक गारेगार प्रेसरूममध्ये प्रवेश करते झाले. ज्येष्ठ पत्रकार राम पवार व राजेश पुरंदरे याआधीच तेथे आलेले होते. आम्ही पाणी पिऊन ताजेतवाने होईस्तो ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक आमच्यात सामील झाला....

का झाली महाराष्ट्र भाजपची बोलती बंद?

'इंडिया टुडे' या देशातील प्रख्यात साप्ताहिकाने औरंगजेब कबरीसंदर्भातील वादावर आधारित कव्हरस्टोरी केली आहे. समतोल आहे, सर्व संबंधितांच्या प्रतिक्रिया आहेत. कबर खणून काढणारेही आहेत तसेच कबरीच्या बाजूनेही बोलणारेही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर आम्ही कबर हटवण्याबाजूचेच आहोत असे ठासून...
Skip to content