Homeकल्चर +'जय जय स्वामी...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका स्वामी समर्थांच्या जीवनातील चमत्कारिक प्रसंग आणि त्यांची अध्यात्मिक लीला उलगडण्यावर आधारित आहे. मालिकेने प्रेक्षकांच्या मनात भक्ती आणि श्रद्धेचा विशेष ठसा उमटवला असून स्वामी समर्थांच्या कथांचा गूढ आणि चमत्कारिक भाग प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.

या आठवड्यात तुम्ही पाहू शकता की, साक्षात महादेवाचे अंश असलेले कर्नाटकच्या मुरगोड गावचे स्वामीभक्त चिदंबर दिक्षित अक्कलकोटमध्ये येऊन एक महायज्ञ आयोजित करतात. या यज्ञादरम्यान एका विचित्र स्थितीत मरण पावलेल्या ब्राह्मणाला स्वामी समर्थ एका विलक्षण अद्भुत लीलेने जिवंत करतात. या घटनेनंतर हा महायज्ञ कसा पूर्ण होतो याची विलक्षण भक्तिमय रंजक गोष्ट. ही मालिका नित्यप्रति जास्त लोकप्रिय होत चालली आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांच्या आयुष्यातील या लीला भक्तांना नवी ऊर्जा आणि अपार श्रद्धा प्राप्त करून देत आहेत.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content