Homeटॉप स्टोरीयेस बँकेच्या सुरक्षेतल्या...

येस बँकेच्या सुरक्षेतल्या त्रुटींमुळे वर्धा बँकेला सव्वा कोटींचा फटका!

ही केस आहे- वर्धा नागरी सहकारी बँकेतील सायबर फसवणूक झाल्याची. मे 2023मध्ये घडलेले हे प्रकरण. वर्धा बँकेच्या येस बँकेतील खात्यातून 24 फसवे RTGS/NEFT व्यवहार करून एकूण एक कोटी 21 लाख रुपये परस्पर काढण्यात आले. हे व्यवहार बँकेच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय आणि त्यांच्या सिस्टम बंद असताना झाले. त्यामुळे बँकेच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. हे प्रकरण प्राधिकृत अधिकारी (Adjudicating Office) असलेल्या राज्याचे माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया यांच्याकडे सुनावणीला आले. येस बँकेच्या सुरक्षेतील त्रुटींमुळे हे घडल्याचे मान्य करत त्यांनी IT Act, 2000 अंतर्गत येस बँकेला नुकसानभरपाईचे आदेश दिले आहेत.

वर्धा बँकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याची परवानगी नसताना अनधिकृतपणे व्यवहार झाल्याने बँकेने तत्काळ सर्व व्यवहार थांबवून सायबर पोलीस सेलमध्ये तक्रार दाखल केली. पण येस बँकेने लाभार्थी खात्यांची माहिती देण्यास उशीर केला. त्यामुळे पैसे परत मिळवणं कठीण झालं.

शोध कसा लावला?

1. बँकेने ताबडतोब सर्व व्यवहार थांबवले आणि सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे तक्रार दाखल केली.

2. पोलीस व सायबर तज्ज्ञांनी बँकेचे लॉगिन, IP ऍक्सेस, व्यवहाराची वेळ आणि सुरक्षा प्रणाली तपासली. बँकेचे सर्व व्यवहार तपासले.

3. तपासात कळलं की, येस बँकेकडून सुरक्षा प्रणालीत त्रुटी होत्या- IP बाइंडिंग, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन नव्हतं आणि फसवणूक ओळखण्याची यंत्रणा कमकुवत असल्याचं आढळलं.

4. येस बँकेकडून व्यवहार झालेल्या खात्यांची माहिती मिळवण्यात उशीर झाला. त्यामुळे पैसे परत मिळवणं कठीण झालं.

5. सायबर कायद्याचे तज्ञ ॲड. महेंद्र लिमये यांनी बँकेची बाजू मांडली. त्यांच्या मदतीने, वर्धा सायबर पोलीस आणि वर्धा बँकेने पुरावे सादर केले आणि दोष येस बँकेच्या सुरक्षा त्रुटींवर टाकला. माहिती-तंत्रज्ञान विभागानेही या तपासात मदत केली. अशी सायबर गुन्हेगारीची केस शोधण्यात पोलिसांनी तांत्रिक कौशल्य, तपासाची चिकाटी आणि कायदेशीर लढाई दाखवली!

कोण होते आरोपी?

तांत्रिकदृष्ट्या, या प्रकरणात थेट आरोपींची ओळख पटली नाही. पण फसवणूक करणाऱ्यांनी बँकेच्या सिस्टीममध्ये घुसखोरी केली होती. येस बँकेवर सुरक्षा त्रुटींसाठी जबाबदारी टाकण्यात आली.

देशभर फसवणूक कशी केली?

अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीत देशभरातील लोकांची माहिती, बँक डिटेल्स किंवा सिस्टममध्ये घुसखोरी करून पैसे काढले जातात.

– आरोपी अनेकदा बनावट खाते, फेक कंपन्या किंवा इतरांच्या खात्यांचा वापर करून पैसे वेगवेगळ्या खात्यांत वळवतात.

सुनावणी आणि निकाल:

ही सुनावणी महाराष्ट्र राज्याचे Adjudicating Officer आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सचिव पराग जैन नैनुटिया यांच्याकडे झाली. त्यांनी येस बँकेला ₹ 1.21 कोटी मूळ रक्कम आणि व्याज, प्रतिष्ठा, मानसिक त्रास, कोर्ट खर्च यासह ₹ 29.83 लाख नुकसानभरपाई एक महिन्यात भरण्याचा आदेश दिला. हा निकाल IT Act, 2000 अंतर्गत दिला गेला आणि भारतात सायबर सुरक्षा, सायबर फसवणुकीसाठी आणि बँकिंग सिस्टमसाठी हा निर्णय मोठा संदेश ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

रश्दींचे ‘सॅटेनिक..’ मोकळे तर खोमेंनीचा इराण होरपळतोय!

काल 19 जूनला प्रसिद्ध ब्रिटिश-भारतीय लेखक सलमान रश्दी यांचा जन्मदिवस. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 2 महिने आधी ते मुंबईत जन्मले. 1981मध्ये 'मिडनाईट चिल्ड्रेन' कादंबरीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार मिळाला असला तरी त्यांची खरी ओळख आहे-  दी सॅटेनिक व्हर्सेस, या...

‘लाडकी बहिण’ घसरवतेय राज्याचा आर्थिक गाडा!

सध्या महाराष्ट्र राज्यावर एकूण कर्जाचा बोजा तब्बल ₹ 9.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, जो गेल्या दहा वर्षांत तीनपट वाढला आहे. हे कर्ज राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या (GSDP) सुमारे 18.5 % आहे, म्हणजेच प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकाच्या डोक्यावर सरासरी ₹ 49,000...

इराण आणि इस्त्राईल यांच्यात होती तब्बल 30 वर्षे पक्की दोस्ती! 

तुम्हाला कदाचित हे वाचून धक्का बसेल; पण हाच इतिहास आहे. 1948 ते 1979 या काळात इराण आणि इस्त्राईलमध्ये अतिशय चांगले संबंध होते, कारण दोघांनाही अरब देशांचा धोका वाटायचा. विशेषतः इराक आणि अरब राष्ट्रांची 'पॅन-अरॅब' एकजूट. 1979 साली इराणमध्ये इस्लामिक...
Skip to content