Homeबॅक पेजआदित्य ठाकरेंना संपवणारा...

आदित्य ठाकरेंना संपवणारा शकुनी मामा वरूण सरदेसाई!

जसे उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याच्या प्रक्रियेत शकुनीमामाची भूमिका संजय राजाराम राऊत यांनी वठवली आहे तशीच भूमिका वरूण सरदेसाई आदित्य ठाकरेंच्या राजकीय आयुष्यात वठवित आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना संपवले. आता वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेंना संपवणार, असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

काल रात्रीच समजले की, आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय, त्यांचे लाडके राहुल कनाल उद्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हा त्यांच्यासाठी मोठा वैयक्तिक तसेच राजकीय  धक्का आहे. यांना सर्वस्वी वरूण सरदेसाई जबाबदार आहेत. वरूण सरदेसाईंमुळेच आदित्य ठाकरेंजवळ कोणी उरले नाही. कोविड घोटाळ्यात वरूण सरदेसाईंचे नाव पुढे येऊ शकते. त्या काळात अनेक टेंडर देण्यात हे सरकारी भाचे म्हणून ओळखले जाणारे वरूण सरदेसाई आघाडीवर होते, असेही ते म्हणाले.

वरूण

वरूण सरदेसाईदेखिल भाजपा किंवा शिवसेनेत जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी दिल्ली, नागपूर… कुठे कुठे बैठका झाल्या हे सांगू का? उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कायमचे रिटायर करण्याचे काम संजय राऊत व वरुण सरदेसाई करत आहेत, असेही राणे म्हणाले.

आज स्वाभिमानाची वर्षपूर्ती आहे. २०१९ला बाळासाहेबांचे विचार विकून काँग्रेस आणि  राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन झाले होते. पण ५० योद्धे सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना न्याय दिला. मागील अडीच वर्षात रखडलेली सगळी कामे करून त्यांनी गतिमान सरकार स्थापन केले आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

वरूण

संजय राऊत म्हणाले की शरद पवार समजायला भाजपाला १०० वर्षे लागतील. आम्हाला जर १०० वर्षे लागत असतील तर त्यांचे मालक उद्धव ठाकरे यांना २०० वर्षे लागतील. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे चॉकलेट देऊन घरी कोणी बसवले? गुगली नेमका कोणाला टाकला आणि सिक्सर कोणाच्या गोलंदाजीवर टाकला?, असा सवालही त्यांनी केला.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content