Homeबॅक पेजआदित्य ठाकरेंना संपवणारा...

आदित्य ठाकरेंना संपवणारा शकुनी मामा वरूण सरदेसाई!

जसे उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याच्या प्रक्रियेत शकुनीमामाची भूमिका संजय राजाराम राऊत यांनी वठवली आहे तशीच भूमिका वरूण सरदेसाई आदित्य ठाकरेंच्या राजकीय आयुष्यात वठवित आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना संपवले. आता वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेंना संपवणार, असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

काल रात्रीच समजले की, आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय, त्यांचे लाडके राहुल कनाल उद्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हा त्यांच्यासाठी मोठा वैयक्तिक तसेच राजकीय  धक्का आहे. यांना सर्वस्वी वरूण सरदेसाई जबाबदार आहेत. वरूण सरदेसाईंमुळेच आदित्य ठाकरेंजवळ कोणी उरले नाही. कोविड घोटाळ्यात वरूण सरदेसाईंचे नाव पुढे येऊ शकते. त्या काळात अनेक टेंडर देण्यात हे सरकारी भाचे म्हणून ओळखले जाणारे वरूण सरदेसाई आघाडीवर होते, असेही ते म्हणाले.

वरूण

वरूण सरदेसाईदेखिल भाजपा किंवा शिवसेनेत जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी दिल्ली, नागपूर… कुठे कुठे बैठका झाल्या हे सांगू का? उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कायमचे रिटायर करण्याचे काम संजय राऊत व वरुण सरदेसाई करत आहेत, असेही राणे म्हणाले.

आज स्वाभिमानाची वर्षपूर्ती आहे. २०१९ला बाळासाहेबांचे विचार विकून काँग्रेस आणि  राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन झाले होते. पण ५० योद्धे सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना न्याय दिला. मागील अडीच वर्षात रखडलेली सगळी कामे करून त्यांनी गतिमान सरकार स्थापन केले आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

वरूण

संजय राऊत म्हणाले की शरद पवार समजायला भाजपाला १०० वर्षे लागतील. आम्हाला जर १०० वर्षे लागत असतील तर त्यांचे मालक उद्धव ठाकरे यांना २०० वर्षे लागतील. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे चॉकलेट देऊन घरी कोणी बसवले? गुगली नेमका कोणाला टाकला आणि सिक्सर कोणाच्या गोलंदाजीवर टाकला?, असा सवालही त्यांनी केला.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content