Tuesday, February 4, 2025
Homeचिट चॅटपू. वैद्य विनय...

पू. वैद्य विनय भावे यांचा देहत्याग!

मूळचे रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय नीळकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी काल, २५ जून २०२१ रोजी रात्री १० वाजता मोर्डे (जिल्हा रत्नागिरी) येथे देहत्याग केला.

गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर २६ जूनला सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पू. वैद्य भावे काका सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्यातील मोर्डे येथे राहत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. पू. भावे यांचा संपूर्ण परिवार सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधनारत आहे.

पू. वैद्य विनय भावे यांचा परिचय

पू. वैद्य विनय नीळकंठ भावे हे मूळचे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई या गावचे आहेत. वैद्य परंपरेची त्यांच्या घराण्यातील त्यांची पाचवी पिढी आहे. त्यांनी स्वतःच्या मालकीचा ‘श्री अनंतानंद औषधालय’ या नावाचा आयुर्वेदीय औषधे बनवण्याचा कारखाना स्थापून शास्त्रोक्त आणि प्रभावी औषधांची निर्मिती करत अनेक वर्षे आयुर्वेदाची सेवा केली. अवघ्या महाराष्ट्रातील वैद्यांमध्ये ते ‘वरसईकर वैद्य भावे’ म्हणून प्रसिद्ध होते.

रुग्णांवर उपचार करणे तसेच औषधनिर्मिती या दोन्ही क्षेत्रांतील त्यांचा अनुभव दांडगा होता. अभ्यासू वृत्ती, इतरांना सर्वतोपरी साहाय्य करणे, मनमिळाऊ स्वभाव आणि त्यागी वृत्ती ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. पू. भावे यांना रायगड जिल्हा परिषदेने २०१३ या वर्षी ‘रायगड भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. गेल्या काही वर्षांपासून ते महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा येथे आयुर्वेदशास्त्रातील संशोधक म्हणून सेवारत होते. त्यांच्या देहत्यागामुळे आयुर्वेद क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

Continue reading

जॅकी श्रॉफ, श्वेता बच्चन आदींनी लुटला पुष्पोत्सवाचा आनंद!

मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (पूर्वीच्या राणीच्या बागेत) ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पुष्पोत्सवाला साधारण दीड लाख मुंबईकरांनी भेट दिली. यामध्ये अभिनेता जॅकी...

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...
Skip to content