Homeन्यूज अँड व्ह्यूजउद्धवजी.. तुमचे वहिनींसोबत...

उद्धवजी.. तुमचे वहिनींसोबत कौटुंबिक नाते आहे का?

सांगा उद्धवजी की, तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाविरोधात न्यायालयात लढलात की नाहीत? तुमचे तुमच्या वहिनीसोबत कौटुंबिक नाते आहे, की भांडण? वडिलांची मालमत्ता तुम्ही हडप केली म्हणून तुमच्याच सख्ख्या भावाने आरोप केले की नाहीत?, असे सवाल मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज केले.

उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली. त्यावर पलटवार करताना शेलार म्हणाले की, पंतप्रधानांच्या कुटुंबाचा विषय तुम्हीच काढलाय तर मग तुम्हालाही काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. चुलत भावाला घराबाहेर, पक्षातून बाहेर काढण्यात तुम्हाला आनंद मिळाला की नाही? असे कुटुंबातील बरेच विषय निघतील. त्यामुळे आमच्या पंतप्रधानांच्या कुटुंबावर तर बोलू नकाच, एकेरीत तर अजिबातच बोलू नका. यापुढे पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केलात तर आमचे नेते पण तुमचा अपमान करतील. मग तो सहन करण्याची तयारी ठेवा, असा इशारा शेलार यांनी दिला. आम्ही “मेरी माटी मेरा देशवाले” आहोत. तुमच्यासारखे “माझे कुटुंब माझी जबाबदारी”वाले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव

ज्यांची मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये असलेली सत्ता जाण्याची वेळ आलीय, त्यांना महाराष्ट्रात आणि देशात सत्ता येणार अशी स्वप्ने पडू लागली आहेत. तुमचे खासदार सोडून गेले. आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच सगळे पक्ष सोडून गेले. मग तुमची ग्रामपंचायतीत जी सत्ता होती ती तरी टिकेल का? असा सवाल त्यांनी केला.

मुंबईत आलेले उद्योग पळवून लावायचे तुम्ही.. मुंबईत बुलेट ट्रेन, मेट्रो, मेट्रो कारशेड, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, नवे विमानतळ, जैतापूर प्रकल्प, वाढवण बंदर प्रत्येक प्रकल्पाला विरोध उबाठाने केला. हे विकासाच्या वाटेतील गतिरोधक झाले आहेत. हे कालच्या भाषणात जाहीरपणे त्यांनी दाखवले, अशी टीकाही शेलार यांनी केली.

“मी करणार म्हणजे करणारच…” आरक्षण देणार म्हणजे देणारच…! शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच…! शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच..! महापालिकेवर भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच…! अशा गेल्या 10 वर्षांत 1 हजार 531 घोषणा तुम्ही केल्या. आमच्या बॅक ऑफिसने कालच यांची मागची दहा वर्षांतील भाषणे काढली. त्यामध्ये ही आश्चर्यकारक माहिती समोर आली. काय झाले पुढे त्यांचे? त्यामुळे यांच्या शब्दाला किंमतच नाही. उद्धव ठाकरे म्हणजे “पोकळ शब्दांचे खोडकळ नेते” आहेत, अशा शब्दांतही त्यांनी टीका केली.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content