Homeपब्लिक फिगर२५ जिल्ह्यांतल्या जनतेला...

२५ जिल्ह्यांतल्या जनतेला प्रतीक्षा मुख्यमंत्र्यांच्या सहीची!

कोविडची रूग्णवाढ तसेच रूग्णवाढीच्या दरात कमतरता राखलेल्या मुंबईसह राज्यातल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत शिथिलता आणली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर एक-दोन दिवसांत याबाबतचे आदेश जारी केले जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांना दिली. मात्र, लोकल प्रवासातल्या निर्बंधांमध्ये कितपत शिथिलता द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्र्यांवर सोपवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्क्षतेखाली आरोग्य विभागाचे मंत्री, अधिकारी तसेच कोविडच्या टास्क फोर्सबरोबर बैठक झाली. या बैठकीत कोविड कमी असलेल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये नेमकी कोणती व कशी सूट द्यायची आदी बारकावे एक-दोन दिवसांत निश्चित केले जातील व मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर आदेश जारी केले जातील, असे ते म्हणाले.

कोकणातले रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग व पालघर, मराठवाड्यातला बीड, उत्तर महाराष्ट्रातला अहमदनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातले सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांमधले कोविडचे प्रमाण कमी होत नाही. काही ठिकाणी, आठ जिल्ह्यांमध्ये तर तो जास्त वाढत आहे. त्यामुळे या ११ जिल्ह्यांना निर्बंधांच्या तिसऱ्या टप्प्यातच ठेवण्यात येईल. याऊलट तेथे आवश्यकतेनुसार निर्बंध कडक करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी वा आयुक्तांना देण्यात आल्या आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.

२५ जिल्ह्यां

निर्बंध शिथील करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सध्या सुरू असलेला शनिवार व रविवारचा लॉकडाऊन फक्त रविवारपुरताच केला जाईल. शनिवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत व्यवहार चालू राहतील. हॉटेल, सिनेमागृह, एसी हॉल, व्यायामशाळा आदी ५० टक्के क्षमतेने चालू करण्यास मुभा देण्यात येईल. मात्र, येथील कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण झालेले असावे. लग्नकार्य, समारंभ, राजकीय कार्यक्रम आदींनाही सशर्त परवानगी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकलबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांचा

मुंबईतल्या लोकलच्या प्रवासावरील निर्बंध शिथील करायचे की नाहीत याबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील. काही जणांच्या मते लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वेतून प्रवास करायला परवानगी द्यावी. मात्र, काही जणांचा याला विरोध आहे. कोरोना वाढणार नाही याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या विषयाचा सर्व बाजूंनी विचार केला जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेसाठी तयार

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा विचार करून ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध करण्याबाबत स्वयंपूर्ण राहणे, डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण देणे आदी गोष्टी करण्यात आल्या आहेत. कोरोनावरील उपचारांची कार्यपद्धती आता निश्चित झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या संभाव्य लाटेला तोंड देताना फारशी अडचण येणार नाही. मात्र, रूग्णांनी अंगावर दुखणे काढू नये. बाधेचे लवकर निदान झाल्यावर परिणामकारक उपचार करण्यात येतात, असेही ते म्हणाले.

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content