Homeबॅक पेजउद्धव ठाकरे यांनी...

उद्धव ठाकरे यांनी दोनदा घर सोडले होते….

उद्धव ठाकरे यांनी सांगितले असणार राणेंना बोलवू नका म्हणून… मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा घर सोडलेले होते. हॉलिडे इनमध्ये जाऊन कुटुंबासह राहिलेले आहेत. पण दोनदाही मी साहेबांना तयार करून त्यांना घरी आणले हॉलिडे इनमधून… एकच धमकी साहेबांना असायची. घर सोडायची…, असे उद्गार केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काढले आहेत.

नारायण राणे यांची अवधूत गुप्ते यांनी घेतलेली मुलाखत येत्या रविवारी रात्री ९ वाजता झी मराठी, या वाहिनीवर ‘खुपते तिथे गुप्ते’, या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. त्यात त्यांनी ही माहिती दिली. या मुलाखतीतले काही अंश खास आपल्या वाचकांसाठी…

अवधूत गुप्ते आणि आता मित्रहो… वेळ झाली आहे रॅपिड राऊंडची. राजकारणात जास्त आश्वासक कोण वाटतं? निलेश राणे की नितेश राणे?

नारायण राणे नितेश…

अवधूत गुप्ते- शिवसेना सोडून गेलेल्या कुठल्या नेत्याचे बंड व्यावसायिक स्वार्थासाठी नव्हतं?  छगन भुजबळ, नारायण राणे की एकनाथ शिंदे…

नारायण राणे- —-

अवधूत गुप्ते- इथे एक बॉक्स येईल. त्या बॉक्समध्ये काही वस्तू असतील. त्या भेटवस्तू आहेत असे समजून त्या तुम्ही कोणाला द्याल हे आम्हाला सांगायचं. श्रीफळ… कुणाला द्याल?

नारायण राणे- यांना देऊया ना… अनिल परबना…अवधूत गुप्ते- अरे वाss… डायरेक्ट सिंधुदूर्गचे रेल्वेचे तिकीट आहे. हे तिकीट देऊन कोणाला कोकणात आमंत्रण द्यायला आवडेल?

——-

Continue reading

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...
Skip to content