Homeचिट चॅटरक्षाबंधनाच्या भेटवस्तूंसाठी ‘ट्राइब्ज...

रक्षाबंधनाच्या भेटवस्तूंसाठी ‘ट्राइब्ज इंडिया’!

ट्राइब्ज इंडिया, हे तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला द्यायच्या भेटवस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आदर्श ठिकाण आहे. ट्राइब्ज इंडिया, येथे आदिवासी उत्पादनांच्या आकर्षक आणि उत्कृष्ट हस्तकलेच्या तसेच धातूंच्या वस्तू, वस्त्रे आणि सेंद्रिय हर्बल उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

यंदा ट्राइब्ज इंडिया कॅटलॉगमध्ये खास राखी विभाग तयार केला आहे. स्नेह आणि आधाराचे प्रतीक असणाऱ्या रक्षाबंधन उत्सवाची तयारी करताना आपण भेटवस्तू निवडण्यासाठी आपल्या जवळच्या ट्राइब्ज इंडिया दुकानाला किंवा संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

त्यात देशभरातील आदिवासींनी हाताने बनविलेल्या राख्या, पूजेसाठी वापरले जाणारे धातूचे डबे आणि तोरण आदी सजावटीच्या वस्तू मिळू शकतात. याव्यतिरिक्त, ट्राइब्ज इंडियामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी रंगीबेरंगी कुर्ते, सलवार, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्र शैलीतील जॅकेट्स तसेच माहेश्वरी, चंदेरी, बाग, कंठा, भंडारा, तुसार, संभालपुरी आणि इकत इत्यादी प्रकारातील साड्या, कपडे उपलब्ध आहेत.

आदिवासींच्या विविध वस्तू आणि उत्पादनांच्या विकास आणि विपणनाद्वारे आदिवासींचे जीवनमान उंचावून त्यांचे सबलीकरण करण्याच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने ट्रायफेड ट्राइब्ज इंडिया आपल्या देशभरातील दालनांमधील विक्रीसाठी ठेवलेल्या विविधांगी व आकर्षक श्रेणीतील उत्पादनांची व्याप्ती वाढवत आहे. देशातील 137 ट्राइब्ज इंडिया दालने आणि ई-कॉमर्स मंच (www.tribesindia.com) इथे ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करणारी उत्पादने उपलब्ध करून देतात.

कठपुतळीसारख्या मुलांच्या खेळण्यांपासून ते पारंपरिक विणकामापर्यंत जसे की डोंग्रिया शाल आणि बोडो विणकाम असलेली उच्च प्रतीची आणि विविधांगी वस्त्रप्रावरणे आणि रेशमी वस्त्रे; धातू शिल्प ते बांबू उत्पादने; अशी कोणतीही आणि प्रत्येक प्रकारची भेटवस्तू इथे उपलब्ध आहे. सर्व भेटवस्तूसाठी सेंद्रिय, पुनर्चक्रीकरणीय, शाश्वत वेष्टन साहित्य वापरले जाते, ज्याची रचना सुप्रसिद्ध डिझायनर रीना ढाका यांनी केली आहे.

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content