Homeडेली पल्सआयएसआय मार्क नसलेली...

आयएसआय मार्क नसलेली खेळणी जप्त!

बीआयएस म्हणजेच भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेने भिवंडीतल्या बेबी कार्ट कंपनीच्या गोदामावर छापा घालून आयएसआय मार्क नसलेली 367 इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल खेळणी जप्त केली.

ही खेळणी वैध आयएसआय  प्रमाणन चिन्हांशिवाय साठवण्यात आली होती आणि ती विकलीही जात होती. प्रमाणित नसलेल्या खेळण्यांची विक्री करणे  म्हणजे, खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेश, 2020 आणि बीआयएस कायदा, 2016च्या कलम 17चे उल्लंघन आहे. बीआयएस कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली जाईल.

याव्यतिरिक्त, अशा बनावट उत्पादनांच्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या ई-कॉमर्स वेबसाइटवर कारवाई केली जाईल. बीआयएस कायद्यानुसार, उल्लंघन करणाऱ्यांना पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि/किंवा किमान दोन लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यानंतरच्या उल्लंघनासाठी दंड पाच लाख रुपये किंवा त्याहून अधिक वाढू शकतो. तसेच  संबंधित वस्तूंच्या किंमतीच्या दहापट दंडदेखील न्यायालयाकडून आकारला जाऊ शकतो.

ग्राहकांनी कोणतीही खरेदी करण्यापूर्वी उत्पादनांच्या बीआयएस  प्रमाणन दर्जाविषयी पडताळणी करावी. बीआयएस केअर ऍप वापरकर्त्यांना कोणत्याही उत्पादनाच्या परवानाची स्थिती तपासण्याची परवानगी असते. जर परवाना निलंबित, स्थगित किंवा कालबाह्य आढळला तर ग्राहक ऍपद्वारे तक्रारी दाखल करू शकतात. जर बीआयएस मानक चिन्हांचा (आयएसआय मार्क, हॉलमार्क आणि बीआयएस नोंदणी चिन्हांसह) गैरवापर केल्याचे लक्षात आल्यास, लोकांनी ईमेल, पत्र किंवा बीआयएस केअर ऍपद्वारे तक्रार करण्याचे आवाहनही बीएसआयने केले आहे. बीएसआयचे ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. तक्रारदाराने दिलेली सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content