Homeडेली पल्सएशियाटिक सोसायटीत आज...

एशियाटिक सोसायटीत आज केतकर विरूद्ध सहस्रबुद्धे!

मुंबईतल्या प्रसिद्ध एशियाटिक सोसायटीच्या नव्या कार्यकारिणीसाठी आज निवडणूक होत असून यात दोन विभिन्न विचारसरणीचे पॅनल परस्परांविरूद्ध उभे ठाकले आहेत. समाजवादी विचारसरणीचे माजी खासदार पद्मश्री कुमार केतकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे राष्ट्र प्रथम पॅनलचे माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. २२१ वर्षे जुन्या या एशियाटिक सोसायटीचे भवितव्य आज या दोघांपैकी एका पॅनलच्या हाती जाईल.

या दोन्ही पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे-

समाजवादी पॅनल-

कुमार केतकर (अध्यक्ष), प्रा. ए. डी. सावंत, प्रा. अर्जुन डांगळे, प्रा. दीपक पवार, सुनील कदम (सर्व उपाध्यक्ष), सी. एम. पॉलसेल (सचिव), भारत गोठोस्कर, इब्राहीम अफगाण, डॉ. कुंदा पी. एन., नंदिनी आत्मसिद्ध, सुनंदा भोसेकर, स्वाती दाते (सर्व समिती सदस्य).

राष्ट्र प्रथम पॅनल-

डॉ. विनय सहस्रबुद्धे (अध्यक्ष), पद्मश्री रमेश पतंगे, प्रा. डॉ. संजय देशमुख, पद्मश्री डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, नितीश भारद्वाज, (सर्व उपाध्यक्ष), विवेक गणपुले (सचिव), माधव भांडारी, डॉ. प्राची मोघे, डॉ. मल्हार कुलकर्णी, एड. राजेश बेहरे, वैजयंती चक्रवर्ती, प्रमोद बापट (सर्व समिती सदस्य), डॉ. माधवी नरसाळे, दत्तात्रय पंचवाघ, अमोल जाधव, अभिजीत मुळ्ये, मल्हार गोखले, उमंग काळे, स्नेहा नगरकर (सर्व छाननी समिती सदस्य).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content