Homeडेली पल्सफास्टॅग युझर्ससाठी ही...

फास्टॅग युझर्ससाठी ही आहे महत्त्वाची बातमी!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) देशातील सर्व फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांना एक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यामध्ये बँकांना त्यांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या फास्टॅगशी लिंक असलेल्या ‘वाहन नोंदणी क्रमांकांची’ त्वरित आणि अनिवार्य पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टोल संकलन प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्व बँकांनी त्यांच्या डेटाबेसमध्ये असलेल्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकांची अचूकता तपासणे आवश्यक आहे. अनेकदा फास्टॅग घेताना तात्पुरता नोंदणी क्रमांक वापरला जातो किंवा माहिती अपूर्ण असते. अशा प्रकरणांमध्ये आता अधिकृत ‘वाहन’ पोर्टलवरील माहितीशी जुळणी करून पडताळणी करावी लागणार आहे.

‘एक वाहन, एक फास्टॅग’ धोरण

या पडताळणीमुळे एकाच वाहनावर अनेक फास्टॅग असणे किंवा एकाच फास्टॅगचा वापर वेगवेगळ्या वाहनांसाठी करणे, अशा गैरप्रकारांना आळा बसेल.

वाहनधारकांवर काय परिणाम होणार?

ज्या वाहनधारकांचे फास्टॅग त्यांच्या योग्य नोंदणी क्रमांकाशी जोडलेले नाहीत किंवा ज्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत, अशा वापरकर्त्यांना बँकांकडून केवायसी अपडेट करण्याच्या सूचना मिळू शकतात. पडताळणी पूर्ण न झाल्यास संबंधित फास्टॅग काळ्या यादीत (ब्लॅकलिस्टेड) टाकला जाऊ शकतो, ज्यामुळे टोल नाक्यांवर दुप्पट टोल भरावा लागण्याची शक्यता आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी आणि महामार्गावरील प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी ‘एनएचएआय’ने हे कडक पाऊल उचलले आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content