19 ते 22 सप्टेंबरदरम्यान होणार विश्व भारतीय खाद्य महोत्सव

केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय येत्या 19 ते 22 सप्टेंबर 2024 या कालावधीत जागतिक आणि भारतीय अन्न क्षेत्रातील हितधारकांमध्ये सहयोग वाढवण्यासाठी विश्व भारतीय खाद्य महोत्सव, हा देशातील भव्य खाद्य महोत्सव आयोजित करत असल्याची घोषणा केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी काल केली.

याव्यतिरिक्त, वाढत्या स्टार्टअप परिसंस्थेला चालना देण्यासाठी आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्याकरिता मंत्रालय स्टार्टअप इंडियाच्या सहकार्याने दुसऱ्या स्टार्टअप ग्रँड चॅलेंजचे आयोजन करत आहे. विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023ला अभूतपूर्व यश मिळाले. त्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे आयोजन केले

जाणार आहे. मागच्याखेपेला झालेल्या महोत्सवात 1,208 प्रदर्शक, 90 देशांतील 715 आंतरराष्ट्रीय खरेदीदार, 24 राज्ये आणि 75,000 अभ्यागतांचा सहभाग होता. या महामहोत्सवात 16,000हून अधिक B2B/B2G बैठका, गोलमेज चर्चासत्र, 47 संकल्पनात्मक सत्रे, सामंजस्य करार, प्रदर्शने, एक स्टार्ट-अप ग्रँड चॅलेंज आणि अन्य काही वैशिष्ट्यपूर्ण होते, जे जागतिक व्यासपीठावर अन्न प्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रातील भारताचे वर्चस्व दर्शविते.

तिसऱ्या विश्व भारतीय खाद्य महोत्सवाची नांदी म्हणून, मंत्री चिराग पासवान आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024साठी संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपचेही अनावरण केले. शेतीचा अपव्यय कमी करण्यासाठी, मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी, अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतापासून ग्राहकापर्यंत पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी अन्नप्रक्रिया क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.

आपल्या विशेष भाषणात, राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी भारताच्या अन्नप्रक्रिया क्षेत्राच्या परिवर्तनीय क्षमतेवर भर दिला. अन्न-प्रक्रिया तंत्रज्ञानातील प्रगती कृषी संपत्तीचे रूपांतर मजबूत आर्थिक शक्तीमध्ये करू शकत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Continue reading

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...
Skip to content