Homeकल्चर +'सजना'चं शीर्षकगीत प्रेक्षकांच्या...

‘सजना’चं शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला!

भारतीय संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारा ‘सजना’ चित्रपटाचे टायटल साँग (शिर्षकगीत) प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रेमातील हळव्या भावनांना स्पर्श करत, या गीतामध्ये प्रेमातील गोडवा, आठवणी, आणि नात्यांमधील निखळपणा अगदी हृदयस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आला आहे. गाण्याचं चित्रिकरणदेखील अत्यंत नयनरम्य आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि राजेश्वरी पवार यांच्या भावस्पर्शी आवाजात सजलेले हे गाणं प्रेमाची नाजूक आणि गहिरं भावना व्यक्त करते.

या गाण्याला संगीत दिलं आहे ओंकारस्वरूप यांनी, तर गाण्याचे बोल लिहिले आहेत सुहास मुंडे यांनी. हे गाणं केवळ एक संगीतकृती नसून, प्रेमाच्या भावना, आठवणी आणि नात्यांची गुंफण उलगडणारं एक सुंदर चित्रण आहे. गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘सजना’ ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित एक प्रेमकथा आहे. या चित्रपटाची निर्मिती सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनसुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत प्रेम, भावना आणि संगीत यांचं अनोखं मिश्रण घेऊन येणारा हा चित्रपट २३ मे २०२५ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content