Friday, February 14, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजरोजच्या प्रदूषणावर 'बांबू...

रोजच्या प्रदूषणावर ‘बांबू लावणे’ हाच उपाय! 

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बांबू लागवड यांचा काय संबंध आहे, असा प्रश्न विचारला तर कदाचित राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे उत्तर नसेल.. पण तरीही राज्यात बांबू लागवडीला प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवली जाणार आहे.

अजित पवार यांनी ही घोषणा शुक्रवारी त्यांच्या ६३ मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली आणि दहा हजार हेक्टर (पंचवीस हजार एकर) खासगी क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे, हेही जाहीर केले. या योजनेअंतर्गत बांबूच्या एका रोपापोटी बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला १७५ रुपयांचे अनुदान मिळणार आहे. सुरुवातीला नंदूरबार जिल्ह्यात एक लाख वीस हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे.

बांबू

अजित पवार यांनी ही घोषणा केली खरी पण त्यातील बांबूच्या उल्लेखानंतर सभागृहात हंशा उसळला. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे बघत खुणेनेच त्यांना इशारा केला की बघा, अर्थमंत्री काय सांगताहेत.. त्यावर खुणेनेच मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिले की हे जे काही आहे, ते तुमच्यासाठीच आहे.. त्यावर सभागृहात पुन्हा हंशा उसळला आणि अजित पवार मात्र गंभीरपणे त्यांचे लेखी भाषण वाचत बांबू लागवडीच्या प्रोत्साहनाचा प्लान वाचत होते.

अर्थसंकल्पानंतरच्या पत्रकार परिषदेतही बांबू लागवडीचा विषय चर्चिला गेला. शिवसेनेचे संजय राऊत यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी त्यांच्यावर टीका केली. बांबू लागवडीचा उल्लेख करत ते म्हणाले की, रोज सकाळी सकाळी महाराष्ट्रात प्रदूषण सुरू होते.. म्हणजे ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणही सुरू होते. बांबू इतर वनस्पतींपेक्षा २० टक्के जास्त प्राणवायू सोडतो आणि कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतो. त्यामुळे या रोजच्या प्रदूषणावर बांबूमुळे उपाय होऊ शकेल.

बांबू

संजय राऊत यांच्या सर्व टिव्हीवाल्यांना बाईट देत सुरू होणाऱ्या दिवसाचा संदर्भ मुख्यमंत्र्यांच्या दैनंदिन प्रदूषण या शब्दाला होता. त्यामुळे पत्रकार परिषदेतही पुन्हा एकच हंशा उसळला.

Continue reading

हिवाळी अधिवेशनाच्या सहलीतून जनतेला नेमके काय मिळाले?

नागपूर कराराचे पालन करण्याची संविधानिक जबाबदारी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊन राज्य सरकारने पूर्ण केली पण विदर्भाच्या सर्वसामान्य नागरिकांना या सहा दिवसांच्या कामकाजातून नेमके काय मिळाले, हा प्रश्न नेहमीप्रमाणे अनुत्तरितच राहिला. कापूस, सोयाबीनला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळतो का, विदर्भातील किंवा...

बीड सरपंचांच्या हत्त्येची एसआयटी तसेच न्यायालयीन चौकशी

बीडमध्ये झालेल्या संतोषअण्णा देशमुख या सरपंचाच्या हत्त्येप्रकरणी पोलीस महानिरीक्षकांच्या एसआयटीद्वारे म्हणजेच विशेष चौकशी पथकाद्वारे चौकशी केली जाईल आणि या प्रकरणात गुन्हेगारीच्या इको-सिस्टिमसंदर्भात न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. या दोन्ही चौकश्या तीन...

बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो..

बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो.. महाराष्ट्रात सध्या राजकारणात काय चाललंय समजत नाही, कोण कुणाबरोबर जाईल आणि कोण नेमके कोणत्या पक्षात आहे, हे समजत नाही, अशी स्थिती आहे, ही तक्रार बरेचजण करतात. पण, मुळात गुंतागुंतीचे...
Skip to content