Homeन्यूज अँड व्ह्यूजरोजच्या प्रदूषणावर 'बांबू...

रोजच्या प्रदूषणावर ‘बांबू लावणे’ हाच उपाय! 

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बांबू लागवड यांचा काय संबंध आहे, असा प्रश्न विचारला तर कदाचित राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे उत्तर नसेल.. पण तरीही राज्यात बांबू लागवडीला प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवली जाणार आहे.

अजित पवार यांनी ही घोषणा शुक्रवारी त्यांच्या ६३ मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली आणि दहा हजार हेक्टर (पंचवीस हजार एकर) खासगी क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे, हेही जाहीर केले. या योजनेअंतर्गत बांबूच्या एका रोपापोटी बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला १७५ रुपयांचे अनुदान मिळणार आहे. सुरुवातीला नंदूरबार जिल्ह्यात एक लाख वीस हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे.

बांबू

अजित पवार यांनी ही घोषणा केली खरी पण त्यातील बांबूच्या उल्लेखानंतर सभागृहात हंशा उसळला. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे बघत खुणेनेच त्यांना इशारा केला की बघा, अर्थमंत्री काय सांगताहेत.. त्यावर खुणेनेच मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिले की हे जे काही आहे, ते तुमच्यासाठीच आहे.. त्यावर सभागृहात पुन्हा हंशा उसळला आणि अजित पवार मात्र गंभीरपणे त्यांचे लेखी भाषण वाचत बांबू लागवडीच्या प्रोत्साहनाचा प्लान वाचत होते.

अर्थसंकल्पानंतरच्या पत्रकार परिषदेतही बांबू लागवडीचा विषय चर्चिला गेला. शिवसेनेचे संजय राऊत यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी त्यांच्यावर टीका केली. बांबू लागवडीचा उल्लेख करत ते म्हणाले की, रोज सकाळी सकाळी महाराष्ट्रात प्रदूषण सुरू होते.. म्हणजे ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणही सुरू होते. बांबू इतर वनस्पतींपेक्षा २० टक्के जास्त प्राणवायू सोडतो आणि कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतो. त्यामुळे या रोजच्या प्रदूषणावर बांबूमुळे उपाय होऊ शकेल.

बांबू

संजय राऊत यांच्या सर्व टिव्हीवाल्यांना बाईट देत सुरू होणाऱ्या दिवसाचा संदर्भ मुख्यमंत्र्यांच्या दैनंदिन प्रदूषण या शब्दाला होता. त्यामुळे पत्रकार परिषदेतही पुन्हा एकच हंशा उसळला.

Continue reading

सुधीरभाऊंचे स्थान मुख्यमंत्री फडणवीसांच्या मनःपटलावर खूप वरचे!

सुधीरभाऊ यांचे स्थान आमच्या मनःपटलावर खूप वरचे आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्तृत्त्वाच्या योग्यतेची जागा दिली जाईल. नुसतेच भत्ते दिले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी टिप्पणी केली की, मुख्यमंत्रीमहोदय तुम्ही...

महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांच्या निवडणुका येत्या डिसेंबरमध्येच!

राज्यातील २९ महापालिकांच्या बहुप्रतिक्षित निवडणुका येत्या डिसेंबर महिन्यात घेतल्या जातील तर त्याआधी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अनुक्रमे नगरपरिषदा-नगरपंचायती आणि जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. कोरोना साथीच्या काळापासून राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुदती उलटून गेल्यानंतरही झालेल्या...

चेतन तुपे यांच्यावर विधानसभेत आली नामुष्कीची वेळ

पुरेशी माहिती न घेता बोलणे आणि तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून काम करताना आमदार म्हणून असलेल्या राजकीय अभिनिवेशांना बाजूला ठेवावे लागते, या मूलभूत जबाबदारीचा विसर पडणे, या गोष्टींमुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्यावर शुक्रवारी विधानसभेत नाचक्की ओढवून...
Skip to content