Homeब्लॅक अँड व्हाईटवर्णमुद्राचे 'मोहोळ'- कौशल्य...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले ‘मोहोळ’ हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि ‘भिडल्या’ त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. ‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत, इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं, असे उद्गार प्रस्तावनेत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत अनंत भालेराव यांनी काढल्यामुळे या पुस्तकावर सध्यातरी लिहिणार नाही!

मग तुम्ही विचाराल आज काय? आज केवळ वर्णमुद्राचे कौतुक! पुस्तक वा ग्रंथाच्या संदर्भात लेखकाचे सोडून प्रकाशकाचे कौतुक करण्यात शहाणपण नसून वेडेपणाच दिसतोय, असं तुम्ही म्हणालही! हल्ली काय, कुणीही कुणावर काही काही बोलत असतात.. शेगाव मुक्कामी असलेल्या या प्रकाशन संस्थेने पोस्टाने पुस्तक पाठवण्याचा जणू वस्तुपाठच घेतला आहे असे म्हणा ना! ब्राऊन पेपरच्या वेष्टनात नीट बंदोबस्तात पाठवलेली पुस्तके तुम्ही-आम्ही सर्वांनीच पाहिलेली आहेत. परंतु वर्णमुद्राने छोटेखानी बॉक्समधून हे पुस्तक पाठवलेले आहे. म्हणूनच वर्णमुद्राचे मनोज पाठक यांचं मुद्दामहून कौतुक. अशा देखण्या पोस्टेजने मला आलेलं हे पहिलं पुस्तक व तेही मित्र असलेल्या सहकाऱ्याचं!!

“कोई फुल धूप की पत्तीयों मे हरे रिबन मे बंधा हुआ

वो गजल का लहजा नया नया

न कहा हुआ न सुना हुआ” (बशीर बद्र)

‘मोहोळ’ वाचण्यापूर्वी हे सहजंच हे सुचलं…

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

अंबरीश मित्रा, दुर्गाबाईंच्या नावाने ‘हुंदका’ काढलास म्हणून….

अंबरीश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, अभ्यासू माणूस!आतापर्यंत कधीच कोणत्या वादात पडला नाही, पडण्याची गरजही नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो काही काळ करंजिया यांच्या 'डेली' या इंग्रजी दैनिकात पत्रकारिता करत होता त्यावेळेपासून ओळख व मैत्री आहे. तो मुंबई महापालिकेत यायचा...

बांगलादेशींना हाकलायचंय? मग, वंदे भारतने दिल्ली गाठा…

सध्या मुंबई विभागीय विकास प्राधिकरणात म्हणेच MMRA मध्ये हो, बिचकून जाऊ नका; बांगलादेशी बेकायदा नागरिकांच्या विषयाला नको इतके महत्त्व दिले जात असल्याचे वाटत आहे. नको इतके इतक्यासाठीच म्हटले की, जी मंडळी बांगलादेशींविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचेच सरकार केंद्रात व...

अजि म्या नवल पाहिले…

अजि म्या नवल पाहिले.. तुम्ही चकीत झालात ना? वाचक हो, तुम्ही तर चकीत झाला असाल, पण मला काहीस चुकीच्या ठिकाणी तर उतरलो नाही ना? अशी शंका आली. डोक्याला जास्त ताण देऊ नका! अहो हा आहे मुंबईतल्या दादर रेल्वेस्थानकाबाहेरचा फेरीवालामुक्त...
Skip to content