Homeपब्लिक फिगरग्लोबल साऊथ देशांतला...

ग्लोबल साऊथ देशांतला वसाहतवादी कायद्यांचा वारसा अत्यंत जाचक!

ग्लोबल साऊथ देशांमधील असुरक्षित घटकांसाठी वसाहतवादी कायद्यांचा वारसा अतिशय जाचक असल्याचे मत उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी व्यक्त केले. स्थानिक जनतेसाठी हे कायदे अतिशय जाचक, दबाव आणणारे आणि शोषण करणारे आहेत असे सांगून ग्लोबल साऊथ देशांनी भारताचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याची आणि स्थानिक जनतेला पूर्वग्रह कायम राखून वागणूक देणाऱ्या वसाहतवादी कायद्यांचे पुनरावलोकन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे असे ते म्हणाले.

सर्वांना दर्जेदार कायदेशीर सहाय्य मिळणे सुनिश्चित करणे : ग्लोबल साऊथ मधील आव्हाने आणि संधी, या विषयांवरील पहिल्या प्रादेशिक संमेलनाला उपराष्ट्रपती जगदीप धनकड संबोधित करत होते. ही परिषद भारतीय राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरणाने आंतरराष्ट्रीय विधि प्रतिष्ठान, संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती.

ग्लोबल साऊथ आपल्या उज्ज्वल भविष्याच्या प्रवासाकडे जसजशी वाटचाल करत आहे, तसतसे त्यांना त्यांच्यावरील वसाहतवादी राजवटीचा भूतकाळ झिडकारून, अन्याय आणि असमानतेला खतपाणी घालणारी इतिहासातील बंधने परतवून लावण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

भारतात सध्या कालबाह्य कायद्यांचे पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे नमूद करून यामुळे आपल्या दृष्टिकोनात जमीन अस्मानाचा फरक पडेल तसेच शोषण करणाऱ्या तरतुदी पूर्णपणे रद्द करून त्यांचा नायनाट होईल, असे उपराष्ट्रपती म्हणाले. या क्षेत्रात भारत करत असलेल्या कृतींचा ग्लोबल साऊथ मधील देशांनी सूक्ष्म अभ्यास करावा आणि त्यांना आपल्या देशामधील परिस्थितीनुसार लागू करावे असा सल्ला त्यांनी दिला.

अगदी काही वर्षांपूर्वी एखाद्याला ग्लोबल साऊथ ही संकल्पनादेखील ठाऊक नव्हती, असे सांगून धनकड यांनी ग्लोबल साऊथ ही संकल्पना केंद्रस्थानी आणून जी ट्वेन्टीसारख्या प्रामुख्याने विकसित राष्ट्रांच्या अधिपत्याखाली असलेल्या मंचावर तिला स्थान देण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.

असुरक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक, नाविन्यपूर्ण लोककेंद्रित पावले उचलल्याबद्दल त्यांनी सरन्यायाधीशांचे कौतुक केले. तसेच कायदेशीर मदतीची पुनर्कल्पना, तंत्रज्ञानाचा वापर करणे, समुदायांना सक्षम करणे आणि कायदेशीर सेवा आणि गरजू लोकांमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content