Homeमाय व्हॉईसभारतात खेळण्यांच्या आयातीत...

भारतात खेळण्यांच्या आयातीत 52% घट तर निर्यातीत 239% वाढ!

भारतीय खेळणी उद्योगाने आर्थिक वर्ष 2014-15 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23मध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवली असून आयातीत 52% घट तर निर्यातीत 239%ने वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात उपलब्ध असलेल्या खेळण्यांच्या एकंदरीतच दर्जात सुधारणा झाली आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या विनंतीवरून, भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) लखनौद्वारे केलेल्या “स्वदेशी खेळण्यांची यशोगाथा” या विषयावरील विशिष्ट अभ्यासामध्ये ही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.

सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतीय खेळणी उद्योगासाठी, अधिक पोषक उत्पादनव्यवस्था  निर्माण करण्यात मदत झाली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2014 ते 2020 या 6 वर्षांच्या कालावधीत, या समर्पित प्रयत्नांमुळे उत्पादन कंपन्यांची संख्या दुप्पट झाली आहे, आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या मालावरील अवलंबित्व 33% वरून 12%पर्यंत कमी झाले आहे, एकूण विक्रीमूल्यात 10च्या चक्रवाढ वार्षिक वृद्धीदराने (सीएजीआर) वाढ झाली आहे आणि एकंदर श्रम उत्पादकतेत वाढ नोंदवण्यात आली आहे.

देशांतर्गत उत्पादित खेळण्यांसाठी संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रेलियासह शून्य-शुल्क बाजार प्रवेशासह जागतिक खेळणी मूल्य साखळीत देश एकीकृत झाल्यामुळे भारत सर्वोच्च निर्यातदार राष्ट्र म्हणून उदयास येत आहे, असे विश्लेषण अहवालात करण्यात आले आहे. जगातील सध्याच्या खेळण्यांचे केंद्र, म्हणजे चीन आणि व्हिएतनामसाठी भारताला एक व्यवहार्य पर्याय म्हणून स्थान देण्यासाठी, तंत्रज्ञानातील प्रगती, ई-वाणिज्यचा अवलंब, भागीदारी आणि निर्यातीला प्रोत्साहन, ब्रँड-उभारणीमध्ये गुंतवणूक करणे, शिक्षक आणि पालकांचा मुलांशी संवाद, सांस्कृतिक विविधतेचे जतन आणि प्रादेशिक कारागिरांसह सहयोग यांसारखे सातत्यपूर्ण सहयोगात्मक प्रयत्न खेळणी उद्योग आणि सरकारकडून केले जाणे आवश्यक आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या मुद्द्यांवर काम करण्यासाठी आणि भारतीय खेळणी उद्योगाच्या वाढीला चालना देण्यासाठी,  धोरणात्मक कृती आराखडा आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने, सरकारने आधीच एनएपीटी अंतर्गत उपाययोजना सुरू/ हाती घेतल्या आहेत.

देशांतर्गत उत्पादकांच्या प्रयत्नांसह सरकारच्या धोरणात्मक उपक्रमांमुळे भारतीय खेळणी उद्योगाची उल्लेखनीय वाढ झाली आहे.

Continue reading

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झाला ‘पैलवान दत्तक योजने’चा शुभारंभ

महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (युडब्ल्यूएफआय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात...

‘उधार का उजाला’चे गुरुवारी प्रकाशन

सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’, या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतल्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि या कवितासंग्रहाचे...

जाणून घ्या, गुरू आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व!

उद्या आषाढ पौर्णिमा; म्‍हणजेच साधक, शिष्‍य ज्‍या दिवसाची अत्‍यंत आतुरतेने वाट पाहत असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस! शिष्‍याच्‍या संपूर्ण जीवनाला व्‍यापून राहिलेल्‍या सर्वशक्‍तीमान आणि सर्वज्ञ गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी, साधनेचे पुढील ध्‍येय गाठण्‍याचा निश्‍चय करण्‍यासाठी हा दिवस साधक...
Skip to content