Homeमाय व्हॉईसभारतात खेळण्यांच्या आयातीत...

भारतात खेळण्यांच्या आयातीत 52% घट तर निर्यातीत 239% वाढ!

भारतीय खेळणी उद्योगाने आर्थिक वर्ष 2014-15 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23मध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवली असून आयातीत 52% घट तर निर्यातीत 239%ने वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात उपलब्ध असलेल्या खेळण्यांच्या एकंदरीतच दर्जात सुधारणा झाली आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या विनंतीवरून, भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) लखनौद्वारे केलेल्या “स्वदेशी खेळण्यांची यशोगाथा” या विषयावरील विशिष्ट अभ्यासामध्ये ही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.

सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतीय खेळणी उद्योगासाठी, अधिक पोषक उत्पादनव्यवस्था  निर्माण करण्यात मदत झाली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2014 ते 2020 या 6 वर्षांच्या कालावधीत, या समर्पित प्रयत्नांमुळे उत्पादन कंपन्यांची संख्या दुप्पट झाली आहे, आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या मालावरील अवलंबित्व 33% वरून 12%पर्यंत कमी झाले आहे, एकूण विक्रीमूल्यात 10च्या चक्रवाढ वार्षिक वृद्धीदराने (सीएजीआर) वाढ झाली आहे आणि एकंदर श्रम उत्पादकतेत वाढ नोंदवण्यात आली आहे.

देशांतर्गत उत्पादित खेळण्यांसाठी संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रेलियासह शून्य-शुल्क बाजार प्रवेशासह जागतिक खेळणी मूल्य साखळीत देश एकीकृत झाल्यामुळे भारत सर्वोच्च निर्यातदार राष्ट्र म्हणून उदयास येत आहे, असे विश्लेषण अहवालात करण्यात आले आहे. जगातील सध्याच्या खेळण्यांचे केंद्र, म्हणजे चीन आणि व्हिएतनामसाठी भारताला एक व्यवहार्य पर्याय म्हणून स्थान देण्यासाठी, तंत्रज्ञानातील प्रगती, ई-वाणिज्यचा अवलंब, भागीदारी आणि निर्यातीला प्रोत्साहन, ब्रँड-उभारणीमध्ये गुंतवणूक करणे, शिक्षक आणि पालकांचा मुलांशी संवाद, सांस्कृतिक विविधतेचे जतन आणि प्रादेशिक कारागिरांसह सहयोग यांसारखे सातत्यपूर्ण सहयोगात्मक प्रयत्न खेळणी उद्योग आणि सरकारकडून केले जाणे आवश्यक आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या मुद्द्यांवर काम करण्यासाठी आणि भारतीय खेळणी उद्योगाच्या वाढीला चालना देण्यासाठी,  धोरणात्मक कृती आराखडा आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने, सरकारने आधीच एनएपीटी अंतर्गत उपाययोजना सुरू/ हाती घेतल्या आहेत.

देशांतर्गत उत्पादकांच्या प्रयत्नांसह सरकारच्या धोरणात्मक उपक्रमांमुळे भारतीय खेळणी उद्योगाची उल्लेखनीय वाढ झाली आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content