Homeमाय व्हॉईसभारतात खेळण्यांच्या आयातीत...

भारतात खेळण्यांच्या आयातीत 52% घट तर निर्यातीत 239% वाढ!

भारतीय खेळणी उद्योगाने आर्थिक वर्ष 2014-15 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23मध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवली असून आयातीत 52% घट तर निर्यातीत 239%ने वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात उपलब्ध असलेल्या खेळण्यांच्या एकंदरीतच दर्जात सुधारणा झाली आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या विनंतीवरून, भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) लखनौद्वारे केलेल्या “स्वदेशी खेळण्यांची यशोगाथा” या विषयावरील विशिष्ट अभ्यासामध्ये ही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.

सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतीय खेळणी उद्योगासाठी, अधिक पोषक उत्पादनव्यवस्था  निर्माण करण्यात मदत झाली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2014 ते 2020 या 6 वर्षांच्या कालावधीत, या समर्पित प्रयत्नांमुळे उत्पादन कंपन्यांची संख्या दुप्पट झाली आहे, आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या मालावरील अवलंबित्व 33% वरून 12%पर्यंत कमी झाले आहे, एकूण विक्रीमूल्यात 10च्या चक्रवाढ वार्षिक वृद्धीदराने (सीएजीआर) वाढ झाली आहे आणि एकंदर श्रम उत्पादकतेत वाढ नोंदवण्यात आली आहे.

देशांतर्गत उत्पादित खेळण्यांसाठी संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रेलियासह शून्य-शुल्क बाजार प्रवेशासह जागतिक खेळणी मूल्य साखळीत देश एकीकृत झाल्यामुळे भारत सर्वोच्च निर्यातदार राष्ट्र म्हणून उदयास येत आहे, असे विश्लेषण अहवालात करण्यात आले आहे. जगातील सध्याच्या खेळण्यांचे केंद्र, म्हणजे चीन आणि व्हिएतनामसाठी भारताला एक व्यवहार्य पर्याय म्हणून स्थान देण्यासाठी, तंत्रज्ञानातील प्रगती, ई-वाणिज्यचा अवलंब, भागीदारी आणि निर्यातीला प्रोत्साहन, ब्रँड-उभारणीमध्ये गुंतवणूक करणे, शिक्षक आणि पालकांचा मुलांशी संवाद, सांस्कृतिक विविधतेचे जतन आणि प्रादेशिक कारागिरांसह सहयोग यांसारखे सातत्यपूर्ण सहयोगात्मक प्रयत्न खेळणी उद्योग आणि सरकारकडून केले जाणे आवश्यक आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या मुद्द्यांवर काम करण्यासाठी आणि भारतीय खेळणी उद्योगाच्या वाढीला चालना देण्यासाठी,  धोरणात्मक कृती आराखडा आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने, सरकारने आधीच एनएपीटी अंतर्गत उपाययोजना सुरू/ हाती घेतल्या आहेत.

देशांतर्गत उत्पादकांच्या प्रयत्नांसह सरकारच्या धोरणात्मक उपक्रमांमुळे भारतीय खेळणी उद्योगाची उल्लेखनीय वाढ झाली आहे.

Continue reading

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...
Skip to content