Homeएनसर्कलप्लास्टिकचा वाढता भस्मासूर!

प्लास्टिकचा वाढता भस्मासूर!

वेष्टनासाठी वापरलेल्या प्लास्टिकसह व्यवस्थापन न केलेल्या आणि कचऱ्यात फेकलेल्या टाकाऊ प्लास्टिकचा भूचर आणि जलचर परिसंस्थांवर विपरीत परिणाम होत असतो. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, 2016, देशभरात पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य पद्धतीने प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी वैधानिक चौकट प्रदान करते. मात्र तरीही प्लास्टिकचा हा भस्मासूर वाढतच आहे.

भूचर, जलचर आणि सागरी परिसंस्थेवर एकदा वापरायच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन मंत्रालयाने 12 ऑगस्ट 2021 रोजी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन दुरुस्ती नियम, 2021 अधिसूचित केले, ज्यामध्ये कमी वापरल्या जाणाऱ्या आणि अधिक हानिकारक असलेल्या निवडक प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 16 फेब्रुवारी 2022 रोजी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन दुरुस्ती नियम, 2022 द्वारे प्लास्टिक वेष्टनासाठी वाढीव उत्पादक जबाबदारीची मार्गदर्शक तत्त्वे देखील अधिसूचित केली आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, 2016 च्या अंमलबजावणीच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या पाच वर्षात देशात निर्माण झालेला प्लास्टिक कचऱ्याची माहिती पुढीलप्रमाणे

S. No.YearPlastic Waste Generated (Tonnes Per Annum- TPA)
12016-1715,68,714
22017-186,60,787
32018-1933,60,043
42019-2034,69,780
52020-2141,26,997

ईपीआर मार्गदर्शक तत्वानुसार प्लास्टिक पॅकेजिंगसाठी नोंदणीकृत उत्पादक, आयातदार आणि ब्रँड मालकांची एकूण वाढीव उत्पादक जबाबदारी (ईपीआर) 2022-23 वर्षासाठी सुमारे 3 दशलक्ष टन आहे. पुनर्वापरासह प्लास्टिक पॅकेजिंग कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर नोंदणीकृत प्लास्टिक कचरा प्रोसेसरद्वारे तयार केलेली ईपीआर प्रमाणपत्रे 2.5 दशलक्ष टन आहेत.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content