Homeएनसर्कलप्लास्टिकचा वाढता भस्मासूर!

प्लास्टिकचा वाढता भस्मासूर!

वेष्टनासाठी वापरलेल्या प्लास्टिकसह व्यवस्थापन न केलेल्या आणि कचऱ्यात फेकलेल्या टाकाऊ प्लास्टिकचा भूचर आणि जलचर परिसंस्थांवर विपरीत परिणाम होत असतो. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, 2016, देशभरात पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य पद्धतीने प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी वैधानिक चौकट प्रदान करते. मात्र तरीही प्लास्टिकचा हा भस्मासूर वाढतच आहे.

भूचर, जलचर आणि सागरी परिसंस्थेवर एकदा वापरायच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन मंत्रालयाने 12 ऑगस्ट 2021 रोजी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन दुरुस्ती नियम, 2021 अधिसूचित केले, ज्यामध्ये कमी वापरल्या जाणाऱ्या आणि अधिक हानिकारक असलेल्या निवडक प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 16 फेब्रुवारी 2022 रोजी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन दुरुस्ती नियम, 2022 द्वारे प्लास्टिक वेष्टनासाठी वाढीव उत्पादक जबाबदारीची मार्गदर्शक तत्त्वे देखील अधिसूचित केली आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, 2016 च्या अंमलबजावणीच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या पाच वर्षात देशात निर्माण झालेला प्लास्टिक कचऱ्याची माहिती पुढीलप्रमाणे

S. No.YearPlastic Waste Generated (Tonnes Per Annum- TPA)
12016-1715,68,714
22017-186,60,787
32018-1933,60,043
42019-2034,69,780
52020-2141,26,997

ईपीआर मार्गदर्शक तत्वानुसार प्लास्टिक पॅकेजिंगसाठी नोंदणीकृत उत्पादक, आयातदार आणि ब्रँड मालकांची एकूण वाढीव उत्पादक जबाबदारी (ईपीआर) 2022-23 वर्षासाठी सुमारे 3 दशलक्ष टन आहे. पुनर्वापरासह प्लास्टिक पॅकेजिंग कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर नोंदणीकृत प्लास्टिक कचरा प्रोसेसरद्वारे तयार केलेली ईपीआर प्रमाणपत्रे 2.5 दशलक्ष टन आहेत.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या...
Skip to content