Homeएनसर्कलपावसाळ्यासाठी परिवहन मंत्रालयाचा...

पावसाळ्यासाठी परिवहन मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष सज्ज!

मान्सून सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष संपूर्ण पावसाळ्यात चोवीस तास कार्यरत असेल (दूरध्वनी  क्र. 011-23718525 https://morth.nic.in).

देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या परीचालनावर अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या समस्या, उदा., वाहतूक विस्कळीत होणे, खराब दृश्यमानता आणि खड्ड्यांमुळे होणारे अपघात, पाणी साचणे, रस्त्यावरील अडथळे आणि दरडी कोसळणे, इत्यादी समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

नियंत्रण कक्षाच्या कर्तव्यतत्परतेसाठी समर्पित चमू तैनात करण्यात आले आहेत जेणेकरून सार्वजनिक तसेच सरकारी संस्थांकडून आलेले कॉल प्राप्त करणे आणि राष्ट्रीय महामार्गांच्या परीसंचालनाशी संबंधित पावसाळ्याशी संबंधित घटनांसाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्लॅटफॉर्मवर देखरेख समाविष्ट आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे किंवा नुकसानीशी संबंधित समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि राष्ट्रीय महामार्ग आणि संरचना विकास कार्यालय (एनएचआयडीसीएल)यांच्या संबंधित प्रादेशिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे नियंत्रण कक्षातील चमूंना बंधनकारक करण्यात आले आहे.

Continue reading

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या...
Skip to content