Homeडेली पल्समहाडमधले चवदार तळे...

महाडमधले चवदार तळे होणार सुशोभित

महाराष्ट्रातल्या महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या 20 मार्चला चवदार तळ्याच्या सुशोभिकरण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 55 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिनानिमित्त शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनिल वारे, सहसचिव सोमनाथ बागुल, सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, तहसीलदार महेश शितोळे तसेच संबंधित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

20 मार्च 1927ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे सामाजिक समतेसाठी ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह केला होता. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ यंदाचा 99वा वर्धापनदिन अधिक व्यापक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सुशोभिकरणामुळे या ऐतिहासिक स्थळाला नवे वैभव प्राप्त होणार असल्याने संबंधित यंत्रणांनी कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. वर्धापनदिनानिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी महाडला येणार असल्याने भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सर्वांचा सहभाग सुनिश्चित करणे, कार्यक्रमस्थळी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे सुशोभिकरणाची माहिती नागरिकांना दाखविणे, वाहतूक, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर झाले रिलीज!

भारतीय इतिहासातील जाज्वल्य नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! स्वराज्य स्थापनेचा तो विलक्षण प्रवास आणि महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा एका भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, 'राजा शिवाजी' या द्वैभाषिक (मराठी...

निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज!

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित 'रानसावल्या' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग...

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...
Skip to content