Homeमाय व्हॉईसधुरकट प्रदूषणाची चादर...

धुरकट प्रदूषणाची चादर ओढून पहुडलेले ठाणे!

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर धुरकट प्रदूषणाची चादर ओढून पहुडलेले तुमचे-आमचे ठाणे शहर! ठाणे शहरातील रस्तेही पाण्याने धुऊन काढले जातील, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी करूनही आता पंधरापेक्षा अधिक दिवस उलटलेले आहेत. धुळीची आणि धुरकटतेची पुटे ठाणे शहरावर चढत असताना महापालिका आणि प्रदूषणविरोधी काम करणारी सरकारी यंत्रणा हातावर हात धरूनच गप्प बसणार आहे का, हा ठाणेकरांचा संतप्त सवाल आहे. मुंबईप्रमाणे ठाण्याच्या वाढत्या प्रदूषणासंबंधात राज्य सरकारला पंतप्रधान कार्यालयातून एखादा फोन येण्याच्या प्रतीक्षेत येथील अधिकारी वर्ग आहे का? असेही अनेकजण विचारत आहेत.

माजिवडा परिसरात जेथे प्रदूषणविरोधी यंत्रणा बसवली आहे तेथेच अधिकतम प्रदूषण असल्याचे दिसून आले आहे. या परिसरात कुठल्याही वेळी 50/75 घमेली भरून धूळ सापडेल असे या परिसरात फेरी मारली असता दिसून आले. रेल्वेस्थानक परिसरतात दोन्ही बाजूला (पूर्व व पश्चिम) धुळीचेच साम्राज्य आहे. सुमारे 25 टक्के रिक्षा तसेच अवजड वाहने शहरात प्रदूषण ओकत असतात हेही गंभीरच म्हणायचे नाही का? महापालिका आयुक्त तमाम ठाणेकरांच्या छातीचे खोके झाल्यावरच आपण कारवाईचा बडगा उगारणार का? ठाणेकरांना उत्तर हवे आहे. जागो आयुक्त, जागो!!

Continue reading

.. म्हणून तर उत्तर प्रदेशातल्या झुंडी धावतात इतर राज्यांमध्ये!

"निचली जात है ससूरे.. तुम्हारी हिमंत कैसे हुई, बारात निकालनेकी.. ** मस्ती आवे क्या? चलो सथी, ये बारातीयोंकी जमके मारो.." हा डायलॉग काही कुठल्या वेबसिरीजमधला नाही. परंतु असं घडलंय मात्र नक्की!! तेही उत्तर प्रदेशमधील मथुरा (तेच ते अब मथुरा...

यंदाच्या पावसातही ठाण्यातल्या आनंदाश्रम परिसराची रडगाथा सुरूच!

पावसाळा सुरु झाला की ठाणे शहर व आसपासच्या भागातील विविध रस्त्याच्या कहाण्यांनी वर्तमानपत्रे भरून जात असतात. (तसे पाहिले तर इतर शहरांमध्येही अशीच रडकथा असते.) ठाणे महापालिकेतील सत्ताकेंद्राचे महत्त्वाचा बिंदू असलेल्या 'आनंदाश्रम' परिसरातील रस्त्यांचीही अशीच रडकथा आहे. वरवर पाहता रस्ता...

खरंतर हिंदीभाषिकांनी इतर राज्यांच्या भाषा शिकाव्यात!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील नवे सरकार राज्यात आल्यापासून हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय सुरु झाला आहे हे कुणीही अमान्य करणार नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषा इंग्रजी व हिंदीचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. काही प्रमाणात ते ठीकही आहे. परंतु हिंदी...
Skip to content