Thursday, January 23, 2025
Homeमाय व्हॉईसधुरकट प्रदूषणाची चादर...

धुरकट प्रदूषणाची चादर ओढून पहुडलेले ठाणे!

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर धुरकट प्रदूषणाची चादर ओढून पहुडलेले तुमचे-आमचे ठाणे शहर! ठाणे शहरातील रस्तेही पाण्याने धुऊन काढले जातील, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी करूनही आता पंधरापेक्षा अधिक दिवस उलटलेले आहेत. धुळीची आणि धुरकटतेची पुटे ठाणे शहरावर चढत असताना महापालिका आणि प्रदूषणविरोधी काम करणारी सरकारी यंत्रणा हातावर हात धरूनच गप्प बसणार आहे का, हा ठाणेकरांचा संतप्त सवाल आहे. मुंबईप्रमाणे ठाण्याच्या वाढत्या प्रदूषणासंबंधात राज्य सरकारला पंतप्रधान कार्यालयातून एखादा फोन येण्याच्या प्रतीक्षेत येथील अधिकारी वर्ग आहे का? असेही अनेकजण विचारत आहेत.

माजिवडा परिसरात जेथे प्रदूषणविरोधी यंत्रणा बसवली आहे तेथेच अधिकतम प्रदूषण असल्याचे दिसून आले आहे. या परिसरात कुठल्याही वेळी 50/75 घमेली भरून धूळ सापडेल असे या परिसरात फेरी मारली असता दिसून आले. रेल्वेस्थानक परिसरतात दोन्ही बाजूला (पूर्व व पश्चिम) धुळीचेच साम्राज्य आहे. सुमारे 25 टक्के रिक्षा तसेच अवजड वाहने शहरात प्रदूषण ओकत असतात हेही गंभीरच म्हणायचे नाही का? महापालिका आयुक्त तमाम ठाणेकरांच्या छातीचे खोके झाल्यावरच आपण कारवाईचा बडगा उगारणार का? ठाणेकरांना उत्तर हवे आहे. जागो आयुक्त, जागो!!

Continue reading

बीडच्या आयपीएसला गायब केले, तेव्हा घशात शेंदूर घातला होतात का?

गेल्या २०/२५ वर्षांत बीड - परळी परिसरात याहूनही काळी कांडं घडली.. अहो आयपीएसला गायब केले गेले.. तेव्हा घशात शेंदूर घातला होतात का?.. "करा रे खुशाल करा हवा तो राडा धमाल करण्याचा जमाना आहे बिनधास्त करा, बलात्कार -भ्रष्टाचार - अत्याचार - भरसभेत -...

अजितदादांना नामोहरम करण्याचा भाजपचा प्रयत्न?

गेले सुमारे सव्वा महिना राज्यभर गाजत असलेले बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्त्याप्रकारण संपवण्याचे प्रयत्न सुरु असताना व त्यात अपेक्षित यश दृष्टीपथात असतानाच भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा आरोपाचा 'नगारा' सतत का वाजत आहे, असा प्रश्न राजकीय...

सरपंच हत्त्याप्रकरण होणार शांत? बंधूंना देणार सरपंचपद??

गेले सुमारे महिनाभर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेले बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्त्या प्रकरण लवकरच संपुष्टात येईल असे दिसते. याप्रकरणी दिल्लीवरून पुढाकार घेण्यात आल्याने राज्यातील नेत्यांचा नाईलाज झाल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान देशमुख कुटुंबाने याप्रकरणी उच्च न्यायालयात...
Skip to content