Homeमाय व्हॉईसधुरकट प्रदूषणाची चादर...

धुरकट प्रदूषणाची चादर ओढून पहुडलेले ठाणे!

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर धुरकट प्रदूषणाची चादर ओढून पहुडलेले तुमचे-आमचे ठाणे शहर! ठाणे शहरातील रस्तेही पाण्याने धुऊन काढले जातील, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी करूनही आता पंधरापेक्षा अधिक दिवस उलटलेले आहेत. धुळीची आणि धुरकटतेची पुटे ठाणे शहरावर चढत असताना महापालिका आणि प्रदूषणविरोधी काम करणारी सरकारी यंत्रणा हातावर हात धरूनच गप्प बसणार आहे का, हा ठाणेकरांचा संतप्त सवाल आहे. मुंबईप्रमाणे ठाण्याच्या वाढत्या प्रदूषणासंबंधात राज्य सरकारला पंतप्रधान कार्यालयातून एखादा फोन येण्याच्या प्रतीक्षेत येथील अधिकारी वर्ग आहे का? असेही अनेकजण विचारत आहेत.

माजिवडा परिसरात जेथे प्रदूषणविरोधी यंत्रणा बसवली आहे तेथेच अधिकतम प्रदूषण असल्याचे दिसून आले आहे. या परिसरात कुठल्याही वेळी 50/75 घमेली भरून धूळ सापडेल असे या परिसरात फेरी मारली असता दिसून आले. रेल्वेस्थानक परिसरतात दोन्ही बाजूला (पूर्व व पश्चिम) धुळीचेच साम्राज्य आहे. सुमारे 25 टक्के रिक्षा तसेच अवजड वाहने शहरात प्रदूषण ओकत असतात हेही गंभीरच म्हणायचे नाही का? महापालिका आयुक्त तमाम ठाणेकरांच्या छातीचे खोके झाल्यावरच आपण कारवाईचा बडगा उगारणार का? ठाणेकरांना उत्तर हवे आहे. जागो आयुक्त, जागो!!

Continue reading

एक संध्याकाळ ‘बर्वे संचित’च्या सानिध्यात!

ही संध्याकाळ कधीच विसरता येणारी नाही. (संध्याकाळ हा शब्द वाचला की काही रोमँटिक असं वाटेल, पण असं अजिबात नाही. पण, एका वेगळ्या अर्थाचा 'रोमान्स' जरूर आहे.) गर्दीच्या ठिकाणचे आपले रवींद्र नाट्यमंदिर संध्याकाळी फक्त गर्दीच नव्हे तर वाहतुकीच्या प्रचंड कोंडीसाठीही...

ठाणे शहरातल्या वाहतूककोंडीचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर!

ठाणे शहराच्या कोपरी उड्डाणपुलावर क्रेन कोसळणे, माजिवडा चौकात रस्ता खचणे, घोडबंदर रोडवरील खोळम्बलेली सेवारस्त्यांची कामे, तसेच शहरभर या ना त्या कारणाने खोदून ठेवलेल्या अनेक रस्त्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत असताना त्याचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर फाडले जात असल्याने वाहतूक पोलिसात...

मदिरा व मदिराक्षी! पोलीस अधिकाऱ्यांचे डोंबिवलीच्या वेशीवर ‘मै टल्ली हो गयी..’

डोंबिवलीनजिकच्या शीळ फाट्यावरून डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले नावाचे सुंदर गाव आहे. गावात अजून बऱ्यापैकी निसर्ग शाबूत आहे. उंच इमारती आहेत. पण उंची गगनाला वेसण घालण्याइतपत नाही, ही जमेची बाजू! हे पडले गाव सुरु होताच मुक्ता नामक विकासकाची ओळख व्हायला...
Skip to content