Homeमाय व्हॉईसधुरकट प्रदूषणाची चादर...

धुरकट प्रदूषणाची चादर ओढून पहुडलेले ठाणे!

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर धुरकट प्रदूषणाची चादर ओढून पहुडलेले तुमचे-आमचे ठाणे शहर! ठाणे शहरातील रस्तेही पाण्याने धुऊन काढले जातील, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी करूनही आता पंधरापेक्षा अधिक दिवस उलटलेले आहेत. धुळीची आणि धुरकटतेची पुटे ठाणे शहरावर चढत असताना महापालिका आणि प्रदूषणविरोधी काम करणारी सरकारी यंत्रणा हातावर हात धरूनच गप्प बसणार आहे का, हा ठाणेकरांचा संतप्त सवाल आहे. मुंबईप्रमाणे ठाण्याच्या वाढत्या प्रदूषणासंबंधात राज्य सरकारला पंतप्रधान कार्यालयातून एखादा फोन येण्याच्या प्रतीक्षेत येथील अधिकारी वर्ग आहे का? असेही अनेकजण विचारत आहेत.

माजिवडा परिसरात जेथे प्रदूषणविरोधी यंत्रणा बसवली आहे तेथेच अधिकतम प्रदूषण असल्याचे दिसून आले आहे. या परिसरात कुठल्याही वेळी 50/75 घमेली भरून धूळ सापडेल असे या परिसरात फेरी मारली असता दिसून आले. रेल्वेस्थानक परिसरतात दोन्ही बाजूला (पूर्व व पश्चिम) धुळीचेच साम्राज्य आहे. सुमारे 25 टक्के रिक्षा तसेच अवजड वाहने शहरात प्रदूषण ओकत असतात हेही गंभीरच म्हणायचे नाही का? महापालिका आयुक्त तमाम ठाणेकरांच्या छातीचे खोके झाल्यावरच आपण कारवाईचा बडगा उगारणार का? ठाणेकरांना उत्तर हवे आहे. जागो आयुक्त, जागो!!

Continue reading

मूठ नसलेल्या तलवारीने वार तरी कसा करणार?

मुंबईतील एका आघाडीच्या इंग्रजी वर्तमानपत्राने शहरातील शाळांच्या आसपासचे गर्दीचे, घाणीचे, अरुंद रस्त्यांचे, कित्येक दिवस न उचललेल्या राबीटचा विद्यार्थ्यांना कसा त्रास होत आहें आणि यंत्रणा कशा 'हाताची घडी..' बसल्या आहेत यांचे वास्तव दर्शन घडवले. असे करताना त्यांनी राबीट न उचलण्याचा...

कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या आरक्षणात मोठी लबाडी!

एका घरगुती समारंभानिमित्त गेल्या आठवड्यात कोकणात जायचे होते. आधी मला वाटले की महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती आहे, लगेचच आरक्षण, तिकीट मिळेल. माझा फुगा लगेचच फुटला. अधिस्वीकृती असली तरी काय झाले, रेल्वेकडे तशी नोंद आहें काय? अशी विचारणा झाली. मी नाही...

योगेश दादूस.. दातांवर उपाय करायचाय!

प्रिय राज्यमंत्री योगेश दादूस, पेशंट लाडकी बहीण यशवंतीचा सप्रेम नमस्कार... दादूस, तुला त्रास देत आहे, माफी असावी. खरंतर मला मुंबईला जायचे होते. पण काल चिपळूणहून निघून खेडमार्गे मुंबईला जाण्याचे ठरवले. कारण माझ्या दातांचा भयंकर त्रास होऊ लागल्याने फारच अस्वस्थ झाली होते....
Skip to content