Homeचिट चॅटवस‌ईच्या सूर्योदय आरबीएल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले.

गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर संघावर सात गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबई उपनगरकडून जस्टीनने सर्वात अधिक 15 धावा, तर सिध्दांतने 14 धावा केल्या. सूर्योदय आरबीएल स्कूलच्या अनुज त्रिपाठी याने एकाच षटकात दोन गडी बाद केले. 56 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना सूर्योदय आरबीएल स्कूलचा पहिलाच गडी रोहन गुटाल शून्य धावांवर बाद झाला. पण नंतर अनुज त्रिपाठी 15 धावा केल्या. त्याला रोहित पोथेन आणि ओबेद डायस यांनी दहा, दहा धावा करून सुरेख साथ दिली. लवेश डऊलने सहा धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अनुज त्रिपाठी याला उत्कृष्ट गोलंदाज व सर्वाेत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार ओबेद डायसला देण्यात आला. विजयी संघातील सर्व खेळाडूंचे तसेच अविनाश महाडीक (क्रीडा शिक्षक), शिक्षक शंकर परब, स्टेफी टिचर व महिमा टिचर यांचे प्रिन्सिपॉल अनुसया प्रधान यांनी खास अभिनंदन केले.

Continue reading

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...
Skip to content