Homeकल्चर +सुलोचना देवलकर यांचे...

सुलोचना देवलकर यांचे ‘स्वरसाधक’ प्रकाशित!

सुप्रसिद्ध पत्रकार व गायिका सुलोचना देवलकर यांच्या ‘स्वरसाधक’ या पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या उन्मेष प्रकाशनातर्फे नुकतेच झाले. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आपली उत्तुंग कारकीर्द घडवणाऱ्या पंधरा दिग्गज कलावंतांच्या सांगितिक कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे. या सर्व दिग्गजांशी मुलाखतींच्या निमित्ताने साधलेला मनमोकळा संवाद यात मांडण्यात आला आहे. यातील कित्येक कलाकार आता हयात नसल्यामुळे तर या मुलाखती अधिकच मौलिक झाल्या आहेत.

पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. जसराज, पं. वसंतराव देशपांडे, विदुषी किशोरी आमोणकर, पं. हरी प्रसाद चौरसिया, डॉ. सुशिलाताई पोहनकर, डॉ. शामला भावे, पं. अजय पोहनकर, पं. डी. के. दातार, पं. जयराम आचार्य, उस्ताद दिलशाद खान, बेगम परवीन सुलताना, अण्णा जोशी, विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर आणि विदुषी कौशिकी चक्रवर्ती यांची व्यक्तिचित्रे या मुलाखतींमधून रेखाटण्यात आले आहे.

लेखिकेने मुलाखतींमधून या कलाकारांची संगीतसाधना, आयुष्याची क्षणचित्रे, करावा लागलेला संघर्ष, आलेले अनुभव, मिळालेले मानसन्मान यांसह कलाकारांचे शक्य तितका परिचय यानिमित्ताने मांडला आहे. संगिताच्या क्षेत्रात वाटचाल करू इच्छिणाऱ्या नव्या पिढीतील कलाकारांनी हे पुस्तक जरूर वाचावे आणि या कलावंतांच्या वाटचालीतून प्रेरणा घ्यावी व आपल्या संगीतसाधनेचे मार्ग शोधावेत, या हेतूनेच सुलोचना देवलकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

या पुस्तकाला विख्यात गायिका आशा खाडिलकर यांनी प्रस्तावना लिहीली आहे तर अतिशय समर्पक असा शुभेच्छासंदेश सुप्रसिद्ध साहित्यिका माधवी कुंटे यांनी दिला आहे. हे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे. पृष्ठे- १४३, किंमत- २०० रूपये. अमेझॉनवर रु. १९०/- हे पुस्तक मुंबईत विलेपार्ले पूर्वच्या जवाहर बुक डेपो तसेच मॅजेस्टिक बुक हाऊसमध्येही उपलब्ध आहे.

त्याची लिंक- https://www.amazon.in/dp/9385794779?ref=myi_title_dp

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content