Homeचिट चॅटश्री गणेश आखाड्याच्या...

श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंचे यश

श्री गणेश आखाड्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व मिरा भाईंदर महानगर पालिका आयोजित २०२४-२५च्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत यजमान श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंनी शानदार यश संपादन केले. त्यांच्या पेहेलवानांनी एकूण २७ पदके मिळवली. त्यामध्ये १५ सुवर्ण, ८ रौप्य, ४ कांस्य पदकांचा समावेश आहे.

पदकविजेत्या कुस्तीपटूंना वस्ताद वसंतराव पाटील, वैभव माने, कोमल देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक मिळवलेले १५ पेहेलवान विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी दिपाली जोशी, मिरा भाईंदर क्रीडा विभाग समन्वयक जेरविन अल्मेडिया उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलराज बागल यांनी केले.

स्पर्धेतील पदक विजेते-

सुवर्ण- प्रतिक बोबडे, शिवांश जालुई, दक्ष चौधरी, प्रिया गुप्ता, तनुजा मांढरे, लकी अडबल्ले, ओम जाधव, कविता राजभर, स्नेहा गुप्ता, सुप्रिया गुप्ता, मनस्वी राऊत, आदर्श शिंदे, कोमल पटे, डॉली गुप्ता.

रौप्य- साईनाथ गायकवाड, शिवम गिरी, युवराज माली, पृथ्वीराज बोबडे, अमर खंडारे, विकी बॉइनवाड, साई गवळी.

कांस्य- आदर्श काटकर, महावीर गुप्ता, बालाजी पवार, महेश ढगे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content