Homeचिट चॅटश्री गणेश आखाड्याच्या...

श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंचे यश

श्री गणेश आखाड्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व मिरा भाईंदर महानगर पालिका आयोजित २०२४-२५च्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत यजमान श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंनी शानदार यश संपादन केले. त्यांच्या पेहेलवानांनी एकूण २७ पदके मिळवली. त्यामध्ये १५ सुवर्ण, ८ रौप्य, ४ कांस्य पदकांचा समावेश आहे.

पदकविजेत्या कुस्तीपटूंना वस्ताद वसंतराव पाटील, वैभव माने, कोमल देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक मिळवलेले १५ पेहेलवान विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी दिपाली जोशी, मिरा भाईंदर क्रीडा विभाग समन्वयक जेरविन अल्मेडिया उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलराज बागल यांनी केले.

स्पर्धेतील पदक विजेते-

सुवर्ण- प्रतिक बोबडे, शिवांश जालुई, दक्ष चौधरी, प्रिया गुप्ता, तनुजा मांढरे, लकी अडबल्ले, ओम जाधव, कविता राजभर, स्नेहा गुप्ता, सुप्रिया गुप्ता, मनस्वी राऊत, आदर्श शिंदे, कोमल पटे, डॉली गुप्ता.

रौप्य- साईनाथ गायकवाड, शिवम गिरी, युवराज माली, पृथ्वीराज बोबडे, अमर खंडारे, विकी बॉइनवाड, साई गवळी.

कांस्य- आदर्श काटकर, महावीर गुप्ता, बालाजी पवार, महेश ढगे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content