Homeचिट चॅटदिव्यांग जिल्हास्तरीय स्पर्धेत...

दिव्यांग जिल्हास्तरीय स्पर्धेत सूर्योदय आरबीएल शाळेचे यश

पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग जिल्हास्तरीय स्पर्धेत वसईच्या सूर्योदय आरबीएल मतिमंद मुला-मुलींच्या शाळेने चमकदार कामगिरी करताना ३ सुवर्ण आणि ६ कांस्य पदकांची कमाई केली.

त्यांच्या ओबेद डायसने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आणि गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदके मिळवली. १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रोहित पोतेननेदेखील सुवर्ण पदकाची कमाई केली. तसेच स्नेहा गुप्ता, हर्षित सिंह यांनी कांस्य पदके पटकावली. अनुज त्रिपाठीने गोळाफेक आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तिसरा क्रमांक मिळवला. बहूविकलांग विभागात २५ मीटर चालण्याच्या व बादलीत बॉल टाकणे ह्या स्पर्धेत लायबा शाह हिने दोन कांस्य पदके मिळवली. या सर्व पदकविजेत्यांना शाळेच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे खास अभिनंदन शाळेच्या मुख्याध्यापिका अनुसया प्रधान यांनी केले आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content