Homeटॉप स्टोरीआयपीएलवर सरकार मेहेरबान!...

आयपीएलवर सरकार मेहेरबान! पोलिसांचे १५ कोटी बुडणार!!

महाराष्ट्र राज्य सरकारने आयपीएल तसेच टी-२० क्रिकेट सामन्यांच्या पोलीस बंदोबस्ताच्या शुल्कात बंपर सूट दिली असून ती २०११ सालापासून पूर्वलक्षी प्रभावाने दिल्यामुळे मुंबई पोलिसांचे सुमारे १५ कोटींचे प्रलंबित शुल्क बुडाल्यात जमा आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळवली आहे. २६ जून २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने क्रिकेट सामन्यांसाठी पुरवाव्या लागणाऱ्या पोलीस बंदोबस्तासाठी शुल्काची दरनिश्चिती केली आहे. विशेष म्हणजे हे शुल्क वर्ष २०११पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आले आहे. सद्या टी-२० आणि आयपीएलसाठी ७० लाखांचे शुल्क आकारले जाते. त्यात कपात करत ते फक्त १० लाख करण्यात आले आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचे शुल्क ७५ लाख होते. त्यात कपात करत ते २५ लाख रूपये करण्यात आले आहे. कसोटी सामन्याच्या शुल्कात कपात करत ते २५ लाख करण्यात आले आहे. सध्या हे शुल्क ६० लाख होते. नागपूर, पुणे आणि नवी मुंबई येथे टी-२० आणि आयपीएलसाठी ५० लाख, एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ५० लाख तर कसोटी सामन्यासाठी ४० लाखांचे पोलीस बंदोबस्त शुल्क होते.

मुंबई पोलिसांना या शासननिर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. ३५ स्मरणपत्रे देऊनही मुंबई क्रिकेट असोसिशनने १५ कोटींचे व्याजासकट शुल्क भरलेच नाही. नव्या निर्णयामुळे या संस्थेला अंदाजे 2 कोटींच्या आत रक्कम भरावी लागेल. मागील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत सर्वपक्षीय उमेदवारांतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रलंबित १५ कोटींहून अधिकचे पोलीस बंदोबस्त शुल्क माफ करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती.

अनिल गलगली यांनी शासनास पत्र लिहित चुकीचा आणि पोलीस प्रशासनाचे खच्चीकरण करणारा हा शासननिर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत प्रलंबित शुल्काबाबत झालेली चर्चा आणि हा शासन निर्णय फिक्सिंग असल्याचा आरोप करत या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content