Homeडेली पल्सआजपासून एसटी प्रवास...

आजपासून एसटी प्रवास महागणार!

आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातल्या एसटीचा प्रवास महागणार आहे. हकिम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. ही भाडेवाढ आजपासून अंमलात येत आहे. डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाईभत्त्यात वाढ झाल्यामुळे २६ ऑक्टोबर २०२१ नंतर पहिल्यांदाच एसटीच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्यात आली आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाची २७६वी बैठक अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन) तथा अध्यक्ष, राज्य परिवहन प्राधिकरण संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली २३ जानेवारीला झाली. या बैठकीत राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) व  परिवहन आयुक्त उपस्थित होते. या बैठकीत महामंडळाच्या पर्यावरणपूरक नविन बीएस ६ मानकाच्या नविन साध्या बसेसना टोमॅटो लाल रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. महामंडळाने ५० ई-बसेससाठी पांढरा व हिरवा रंग तसेच १०० ई-बसेससाठी सद्यस्थितीत चलनात असलेल्या शिवनेरीप्रमाणेच आकाशी रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. तसेच रेन्ट-ए-कॅब लायसन्स धारकांचे रेन्ट-ए-कॅब लायसन्स नूतनीकरण करण्यास व अर्जदारास नवीन रेन्ट-ए-कॅब लायसन्स जारी करण्यास मान्यता देण्यात आली, असे प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी सांगितले.

 अशी आहे भाडेवाढ-

साधी बसः सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये. सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १०.०५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) ११ रुपये.

जलद सेवा (साधारण): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये. सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १०.०५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) ११ रुपये.

रात्र सेवा (साधारण बस): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये. सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) ११ रुपये.

निमआराम: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये. सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १३.६५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयन-आसनी: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १३.६५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयनयान: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १४.७५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १६ रुपये.

शिवशाही (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.३५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १४.२० रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १६ रुपये.

जनशिवनेरी (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.९५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १४.९० रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १७ रुपये.

शिवशाही स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.३५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १५.३५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १७ रुपये.

शिवनेरी (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १८.५० रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी २१.२५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) २३ रुपये,

शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. २२ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी २५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) २८ रुपये.

ई बस ०९ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १३.८० रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १५ रुपये.

ई-शिवाई / ई बस १२ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.२० रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १५.१५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १७ रुपये.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content