Homeडेली पल्सआजपासून एसटी प्रवास...

आजपासून एसटी प्रवास महागणार!

आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातल्या एसटीचा प्रवास महागणार आहे. हकिम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. ही भाडेवाढ आजपासून अंमलात येत आहे. डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाईभत्त्यात वाढ झाल्यामुळे २६ ऑक्टोबर २०२१ नंतर पहिल्यांदाच एसटीच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्यात आली आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाची २७६वी बैठक अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन) तथा अध्यक्ष, राज्य परिवहन प्राधिकरण संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली २३ जानेवारीला झाली. या बैठकीत राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) व  परिवहन आयुक्त उपस्थित होते. या बैठकीत महामंडळाच्या पर्यावरणपूरक नविन बीएस ६ मानकाच्या नविन साध्या बसेसना टोमॅटो लाल रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. महामंडळाने ५० ई-बसेससाठी पांढरा व हिरवा रंग तसेच १०० ई-बसेससाठी सद्यस्थितीत चलनात असलेल्या शिवनेरीप्रमाणेच आकाशी रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. तसेच रेन्ट-ए-कॅब लायसन्स धारकांचे रेन्ट-ए-कॅब लायसन्स नूतनीकरण करण्यास व अर्जदारास नवीन रेन्ट-ए-कॅब लायसन्स जारी करण्यास मान्यता देण्यात आली, असे प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी सांगितले.

 अशी आहे भाडेवाढ-

साधी बसः सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये. सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १०.०५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) ११ रुपये.

जलद सेवा (साधारण): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये. सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १०.०५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) ११ रुपये.

रात्र सेवा (साधारण बस): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये. सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) ११ रुपये.

निमआराम: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये. सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १३.६५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयन-आसनी: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १३.६५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयनयान: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १४.७५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १६ रुपये.

शिवशाही (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.३५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १४.२० रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १६ रुपये.

जनशिवनेरी (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.९५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १४.९० रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १७ रुपये.

शिवशाही स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.३५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १५.३५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १७ रुपये.

शिवनेरी (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १८.५० रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी २१.२५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) २३ रुपये,

शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. २२ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी २५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) २८ रुपये.

ई बस ०९ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १३.८० रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १५ रुपये.

ई-शिवाई / ई बस १२ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.२० रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १५.१५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १७ रुपये.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content