Homeटॉप स्टोरीसमान नागरी कायद्याला...

समान नागरी कायद्याला शिवसेनेचा बिनशर्त पाठिंबा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे सूतोवाच केले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असून शिवसेनेचा समान नागरी कायद्याला बिनशर्त पाठींबा असल्याचे शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी, खासदार धैर्यशील माने आणि हेमंत पाटील हेदेखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मु्ख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज एक वर्ष झाले. आजचा हा दिवस आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा दिवस साजरा करत आहोत. निष्ठावान शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेबांची इच्छा भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने पूर्ण झाली आहे. राम मंदिरची निर्मिती करणे, कलम ३७० रद्द करणे व समान नागरी कायदा बनवणे ही बाळासाहेबांची तीन स्वप्ने  होती. त्यापैकी दोन स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली आहेत. समान नागरी कायदा लवकरच येईल. शिवसेनेचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. बाळासाहेबांच्या एक राष्ट्र, एक कायदा, या संकल्पनेशी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुखांशी रक्ताचे नाते सांगणारेच या कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्याबाबत गैरसमज पसरवत आहेत. त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे शिष्टमंडळ नुकतेच उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी सेना भवनमध्ये गेले होते. उद्धव ठाकरे मुस्लिमांना पाठिंबा देतील असा विश्वास मुस्लिमांना आहे. या कायद्यामुळे हिंदूना त्रास सहन करावा लागेल, असे ते म्हणत आहेत, मात्र प्रत्यक्षात हा कायदा हिंदूंना प्रभावित करणार नाही तर फक्त गांधी कुटुंबाला प्रभावित करेल. त्यामुळे उद्धव ठाकरे या कायद्याला विरोध करत आहेत, अशी टीका शेवाळे यांनी केली.

समान

या कायद्याच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांचे व बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होईल. हा कायदा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून प्रत्येकाला त्यांची ओळख विचारात न घेता समान वागणूक देईल. हा कायदा मंजूर होण्यासाठी आम्ही व्हीप जारी करू, असे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा देशात समान नागरी कायदा करण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र तत्कालिन सत्ताधारी काँग्रेसमुळे गेली 75 वर्षे समान नागरी कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, हे दुर्दैवी आहे. देशातील प्रत्येक नागरिकांसाठी व सर्व महिलांसाठीदेखील हा कायदा अत्यंत चांगला आहे. संसदेत हे विधेयक मांडल्यावर शिवसेना त्याला पाठिंबा देईल. तसेच, राज्य विधिमंडळात आगामी पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ ठराव मांडावा व केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली.

खरे पाहता मुस्लिम महिलांसाठी हा कायदा अत्यंत लाभदायक ठरेल. या विधेयकामुळे महिलांचे रक्षण होईल व त्यांच्यासाठी हा कायदा वरदान ठरेल, असा दावा त्यांनी केला. मुस्लिम महिलांना सुरक्षित करणारा हा कायदा ठरेल. देशाचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे कलाम यांनीदेखील समान नागरी कायद्याचे समर्थन केले होते. केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव मांडावा व विधेयक मंजूर करावे अशी विनंती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सर्व पक्षांनी या कायद्याला पाठिंबा द्यावा, धार्मिक रंग देऊ नये, गैरसमज पसरवू नये असे आवाहन त्यांनी केले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content