Homeएनसर्कलथायलँडमध्ये भारतीय बुद्धविहार...

थायलँडमध्ये भारतीय बुद्धविहार उभारा!

थायलँड हे बौद्ध राष्ट्र आहे. थायलँडमध्ये अनेक बुद्धविहारे आहेत. मात्र थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्धविहार आणि महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्यात यावे. त्यासाठी थायलँड सरकारने जमीन द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

बँकॉक येथील दौऱ्यात त्यांनी थायलँडचे संरक्षणमंत्री डॉ. सुतीन कुंगसंग यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्धविहार आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्याची मागणी केली. यावेळी थायलँड पंतप्रधान कार्यालयाच्या प्रमुख पीआरओ डॉ. जीब चंत्रास्मी उपस्थित होत्या. त्यानंतर थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्ध विहार आणि डॉ. आंबेडकर आंतराष्ट्रीय केंद्रासाठी जमीन थायलँड सरकारतर्फे देण्यात येईल, असे आश्वासन डॉ. कुगसंग यांनी दिले.

महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा प्रसार सम्राट अशोक यांनी केला. जगभर बौद्ध धम्माचा प्रसार त्यांनी केला. सम्राट अशोकानंतर सर्वात मोठे धम्मचक्र प्रवर्तन भारतात बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांनी भारताला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. त्यांनी मानवतेच्या, समतेच्या विचारांसाठी उभारलेला मानवमुक्तीचा लढा; त्यांनी भारतात केलेले धम्मचक्र प्रवर्तन याची जगात नोंद झाली आहे. त्यामुळे थायलँडमध्ये डॉ. आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय केंद्र उभारले पाहिजे, अशी सूचना आठवले यांनी डॉ. कुंगसंग यांना केली.

थायलँडमध्येही आठवलेंचे दिसले व्याघ्रप्रेम

थायलँड दौऱ्यात रामदास आठवले यांनी बँकॉक पट्टाया येथील टायगर पार्कला सहकुटूंब भेट दिली. यावेळी त्यांच्या पत्नी सीमा, पुत्र जित, युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, उद्योजक राज वासनिक आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

महाराष्ट्रात कोरडे हवामान सुरू!

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून...

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...
Skip to content