Homeचिट चॅटचंद्रशेखर खैरनार यांना...

चंद्रशेखर खैरनार यांना ‘समाज दीपस्तंभ’ पुरस्कार

‘साहित्यसंपदा’, या साहित्यिकांच्या समूहातील संस्थापक वैभव धनावडे यांनी चंद्रशेखर सुरेश खैरनार यांना ‘समाज दीपस्तंभ’ हा पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. संस्थेच्या आगामी संमेलनात तो त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

चंद्रशेखर खैरनार यांनी सेनादलात असताना तीन लढायांमध्ये सहभाग देऊन केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना आठ सेनापदके मिळाली आहेत. गोवा मुक्ती, भारत-चीन युद्ध, बांगलादेश मुक्ती यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. अनेक आदिवासी मुलांची आश्रमात काळजी

घेतली. त्यांना अन्न, वस्त्र, ज्ञान कसे मिळेल यासाठी ते झटले. जायंट्स इंटरनॅशनलचे फेडरेशनचे अध्यक्ष असताना संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शाखा त्यांनी प्रस्थापित केल्या. अनेक शिबिरे भरवून गरजूंसाठी रक्तदान, मोफत शस्त्रक्रिया, तपासणी, नेत्रदान आदी कार्य केले.

सैन्यदलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी छायाचित्रणासाठी वेळ दिला. धुळे शहरात पहिल्यांदा कलर लॅब सुरु केली. नंतर एल.एल.बी. पदवी प्राप्त करून मुंबईतील मुल्ला अँड मुल्लासारख्या प्रतिष्ठित आस्थापनातून वकिली केली. 

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content