Homeचिट चॅटचंद्रशेखर खैरनार यांना...

चंद्रशेखर खैरनार यांना ‘समाज दीपस्तंभ’ पुरस्कार

‘साहित्यसंपदा’, या साहित्यिकांच्या समूहातील संस्थापक वैभव धनावडे यांनी चंद्रशेखर सुरेश खैरनार यांना ‘समाज दीपस्तंभ’ हा पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. संस्थेच्या आगामी संमेलनात तो त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

चंद्रशेखर खैरनार यांनी सेनादलात असताना तीन लढायांमध्ये सहभाग देऊन केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना आठ सेनापदके मिळाली आहेत. गोवा मुक्ती, भारत-चीन युद्ध, बांगलादेश मुक्ती यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. अनेक आदिवासी मुलांची आश्रमात काळजी

घेतली. त्यांना अन्न, वस्त्र, ज्ञान कसे मिळेल यासाठी ते झटले. जायंट्स इंटरनॅशनलचे फेडरेशनचे अध्यक्ष असताना संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शाखा त्यांनी प्रस्थापित केल्या. अनेक शिबिरे भरवून गरजूंसाठी रक्तदान, मोफत शस्त्रक्रिया, तपासणी, नेत्रदान आदी कार्य केले.

सैन्यदलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी छायाचित्रणासाठी वेळ दिला. धुळे शहरात पहिल्यांदा कलर लॅब सुरु केली. नंतर एल.एल.बी. पदवी प्राप्त करून मुंबईतील मुल्ला अँड मुल्लासारख्या प्रतिष्ठित आस्थापनातून वकिली केली. 

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content