Monday, February 3, 2025
Homeचिट चॅटचंद्रशेखर खैरनार यांना...

चंद्रशेखर खैरनार यांना ‘समाज दीपस्तंभ’ पुरस्कार

‘साहित्यसंपदा’, या साहित्यिकांच्या समूहातील संस्थापक वैभव धनावडे यांनी चंद्रशेखर सुरेश खैरनार यांना ‘समाज दीपस्तंभ’ हा पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. संस्थेच्या आगामी संमेलनात तो त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

चंद्रशेखर खैरनार यांनी सेनादलात असताना तीन लढायांमध्ये सहभाग देऊन केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना आठ सेनापदके मिळाली आहेत. गोवा मुक्ती, भारत-चीन युद्ध, बांगलादेश मुक्ती यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. अनेक आदिवासी मुलांची आश्रमात काळजी

घेतली. त्यांना अन्न, वस्त्र, ज्ञान कसे मिळेल यासाठी ते झटले. जायंट्स इंटरनॅशनलचे फेडरेशनचे अध्यक्ष असताना संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शाखा त्यांनी प्रस्थापित केल्या. अनेक शिबिरे भरवून गरजूंसाठी रक्तदान, मोफत शस्त्रक्रिया, तपासणी, नेत्रदान आदी कार्य केले.

सैन्यदलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी छायाचित्रणासाठी वेळ दिला. धुळे शहरात पहिल्यांदा कलर लॅब सुरु केली. नंतर एल.एल.बी. पदवी प्राप्त करून मुंबईतील मुल्ला अँड मुल्लासारख्या प्रतिष्ठित आस्थापनातून वकिली केली. 

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content