Homeकल्चर +'सजना'चे 'आभाळ रातीला..'...

‘सजना’चे ‘आभाळ रातीला..’ प्रेक्षकांसमोर!

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित सजना चित्रपटातील “आभाळ रातीला” या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला नवा स्पर्श दिला. प्रेम, नातेसंबंध आणि भावना यांची सुरेल गुंफण मांडणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट “सजना” या चित्रपटातील नवीन गाणं “आभाळ रातीला” प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. प्रेम ही भावना केवळ शब्दांतून नाही तर सूरांतूनही अनुभवता येते. ‘आभाळ रातीला ’ हे गाणं त्या प्रेमभावनेचा एक सुंदर अनुभव आहे. मराठी संस्कृतीच्या ठेव्याला उजाळा देणारा आणि परंपरेचा अभिमान जागवणारा हे गाणं आहे. या गाण्यात ढोल-ताशाचा गगनभेदी नाद, लेझीमच्या तालावर अस्सल मराठी पोशाखामध्ये नाचणारी तरुणाई आणि मुख्य अभिनेते आणि देवीच्या मंगलमय स्तुतीचा संगम रसिकांना अनुभवता येतो.

गाण्याच्या चित्रिकरणातदेखील मोठ्या मिरवणुका, ढोल-ताशाचे पथक आणि सजीव लेझीम नृत्य यांचा भव्य प्रदर्शन करण्यात आलं आहे. हे गाणे केवळ मनोरंजन नसून मराठी संस्कृतीच्या गाढ प्रेमाचा आणि परंपरेच्या जपणुकीचा एक सुंदर सोहळा आहे ज्याच्या प्रत्येक ठोक्यातून मराठी अस्मिता झळकते. सुहास मुंडे यांच्या शब्दरचनेमुळे गाण्यात प्रेमभावना अधिक खुलून आल्या आहेत. गाण्याचे चित्रिकरणसुद्धा अतिशय नयनरम्य आहे. ह्या गाण्याचे संगीतकार ओंकारस्वरूप हे आहेत तर गायक आदर्श शिंदे आणि राजेश्वरी पवार हे आहेत.

या गाण्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. शशिकांत धोत्रेंचा हा पहिलाच रोमँटिक सिनेमा आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनसुद्धा त्यांचेच आहे. हा सिनेमा येत्या २३ मेपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content